शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही..."; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष कनमुसे | Updated: April 5, 2025 15:22 IST

Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मोठे विधान केले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : महायुतीचे सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले. पण, प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजूनही निर्णय घेतलेला नाही. सध्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्या संदर्भात सांगितले होते. दरम्यान, आता काल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जावरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगलीत इस्लामपूर येथे पत्रकारांसोबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, 'राज्याचे कृषीमंत्री आणि ज्या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे, असंही खोत म्हणाले. 

'ही फाईल आमच्यासाठी बंद, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही'; वक्फ विधेयकावर संजय राऊतांचं मोठं विधान

"या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का? तर निश्चितपणे दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेला आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल. या संदर्भामध्ये धोरण आखावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असं धोरण आखणार नाही. शेतकरी विरोधी कायदे हठवणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कर्जाचे पीक येणार आहे, असंही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. 

'जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकून लग्न करतात त्यांच्यावर कोण बोलत नाही'

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, खऱ्या अर्थान बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बार्शी आणि लग्न हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. ते सर्वजण साजरे करत असतात. त्यांच्या परिस्थितीनुसार करत असतात. परंतु जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरची खर्च करतात. तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्या गावचे लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारनी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस