शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

Maharashtra Politics : "जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही..."; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष कनमुसे | Updated: April 5, 2025 15:22 IST

Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मोठे विधान केले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : महायुतीचे सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले. पण, प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजूनही निर्णय घेतलेला नाही. सध्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्या संदर्भात सांगितले होते. दरम्यान, आता काल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जावरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगलीत इस्लामपूर येथे पत्रकारांसोबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, 'राज्याचे कृषीमंत्री आणि ज्या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे, असंही खोत म्हणाले. 

'ही फाईल आमच्यासाठी बंद, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही'; वक्फ विधेयकावर संजय राऊतांचं मोठं विधान

"या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का? तर निश्चितपणे दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेला आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल. या संदर्भामध्ये धोरण आखावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असं धोरण आखणार नाही. शेतकरी विरोधी कायदे हठवणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कर्जाचे पीक येणार आहे, असंही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. 

'जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकून लग्न करतात त्यांच्यावर कोण बोलत नाही'

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, खऱ्या अर्थान बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बार्शी आणि लग्न हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. ते सर्वजण साजरे करत असतात. त्यांच्या परिस्थितीनुसार करत असतात. परंतु जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरची खर्च करतात. तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्या गावचे लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारनी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस