शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही..."; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष कनमुसे | Updated: April 5, 2025 15:22 IST

Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मोठे विधान केले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : महायुतीचे सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले. पण, प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजूनही निर्णय घेतलेला नाही. सध्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्या संदर्भात सांगितले होते. दरम्यान, आता काल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जावरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगलीत इस्लामपूर येथे पत्रकारांसोबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, 'राज्याचे कृषीमंत्री आणि ज्या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे, असंही खोत म्हणाले. 

'ही फाईल आमच्यासाठी बंद, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही'; वक्फ विधेयकावर संजय राऊतांचं मोठं विधान

"या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का? तर निश्चितपणे दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेला आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल. या संदर्भामध्ये धोरण आखावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असं धोरण आखणार नाही. शेतकरी विरोधी कायदे हठवणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कर्जाचे पीक येणार आहे, असंही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. 

'जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकून लग्न करतात त्यांच्यावर कोण बोलत नाही'

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, खऱ्या अर्थान बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बार्शी आणि लग्न हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. ते सर्वजण साजरे करत असतात. त्यांच्या परिस्थितीनुसार करत असतात. परंतु जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरची खर्च करतात. तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्या गावचे लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारनी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस