शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'अलमट्टी' उंची वाढीला विरोध करण्यात महाराष्ट्र पिछाडीवर - विशाल पाटील; वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटकसाठी पोषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:14 IST

तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळू : अरुण लाड

सांगली : माजी जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेच अलमट्टी धरणामुळेसांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पूर येत नाही, असा अहवाल दिला. हा अहवालच अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटकला पोषक आहे. अलमट्टी धरणामुळे पूर येतो, असे म्हणण्यासाठी एकही अहवाल महाराष्ट्र सरकारकडे नाही, असा आरोप सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला. त्यामुळेच केंद्र सरकारकडे अलमट्टीविरोधात भूमिका मांडताना अडचणी येत आहेत, असेही ते म्हणाले.अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हालचाली चालू आहेत. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस आमदार रोहित पाटील उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने एकही याचिका दाखल केलेली नाही. याबद्दल महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्र्यांनाही माहिती नाही, हे त्यापेक्षाही धक्कादायक आहे. मुळात महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी अडवण्यात आपण खूपच मागे पडलो आहोत. तसेच अलमट्टी धरणामुळे खरेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पूर येतो का? हे मांडण्यातही महाराष्ट्र सरकार खूपच मागे आहे.

पुन्हा तज्ज्ञ समिती नेमण्याची गरजअलमट्टी धरणामुळेच पूर येतो, हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. या समितीचा अहवाल काय येईल, त्या माहितीवरच आपणास पुन्हा केंद्र शासनाकडे महाराष्ट्राची बाजू मांडता येईल. तसेच सर्वोच्च न्यायालयातही आपल्याला जाता येणार आहे, असेही विशाल पाटील म्हणाले.

तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळू : अरुण लाडअलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारने सर्व तयारी केली आहे. याविरोधात महाराष्ट्र सरकार काहीच करत नाही. या झोपी गेलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात येईल. याबाबतची लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल, असे आमदार अरुण लाड यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रDamधरण