शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरीमुळे बदलली खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे, मतविभाजनाचा कोणाला फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:17 IST

खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातून आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी केल्याने खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. ...

खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातून आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी केल्याने खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत.खानापूर मतदारसंघात शिंदेसेनेचे सुहास बाबर व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. वैभव पाटील यांच्यात थेट लढतीची शक्यता होती. या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता देशमुख गट ज्यांच्या बाजूला त्याचे पारडे जड असते. १९९५ मध्ये राजेंद्रअण्णा देशमुख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.त्यानंतर २०१४ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत त्यांनी इतरांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीतही त्यांचा गट कुणाला पाठिंबा देतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, राजेंद्र देशमुख यांनी स्वतःच बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरले आहेत.

खानापूरच्या मतविभाजनाचा कोणाला फायदा२००९ च्या निवडणुकीत सदाशिवराव पाटील, अनिल बाबर व गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातून घेतलेल्या मतांचा फटका अनिल बाबर यांना बसला. त्यामुळे सदाशिवराव पाटील यांचा विजय झाला होता.२०१४च्या निवडणुकीमध्ये अनिल बाबर, सदाशिवराव पाटील, अमरसिंह देशमुख व गोपीचंद पडळकर अशी चौरंगी लढत झाली होती. या लढतीमध्ये विजयी झालेल्या अनिल बाबर यांच्यापेक्षा आटपाडी तालुक्यातील अमरसिंह देशमुख व गोपीचंद पडळकर यांच्या मतांची बेरीज जास्त होती. त्यामुळे या निवडणुकीत खानापूर तालुक्यातील उमेदवारांच्या मत विभाजनाचा फायदा कोणाला होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khanapur-acखानापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार