शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Vidhan Sabha Election 2024: सांगली जिल्ह्यात 'भाजप'च बाहुबली, जयंत पाटील यांचे मताधिक्य सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:13 IST

आबांचे पुत्र जिंकले, विश्वजीत कदम यांचे मताधिक्यही घटले

सांगली : धक्कादायक निकालांची नोंद करत, महायुतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. आठपैकी पाच जागा महायुतीने तर तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. सर्वाधिक चार जागा जिंकत भाजप हा सांगली जिल्ह्याचा नवा बाहुबली ठरला. त्यामुळे सांगली, मिरजेसह विजयी मतदारसंघात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.सांगली, मिरज, जत व शिराळा या चार मतदारसंघांवर भाजपने विजयी झेंडा फडकवला. शिंदेसेनेने सुहास बाबर यांच्या माध्यमातून खानापूरची जागा राखण्यात यश मिळविले. मात्र, उद्धवसेनेला जिल्ह्यात खाते उघडता आले नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसला मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येकी एका जागेचे नुकसान झाले.महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ या दोन तर काँग्रेसला पलूस-कडेगाव या एकाच जागेवर विजय मिळविता आला. मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या मताधिक्यात मोठी घट नोंदविली गेली. त्यामुळे घटलेल्या मताधिक्याचा धक्काही त्यांना बसला.जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय निकाल असामतदारसंघ - विजयी उमेदवार - पक्ष - मताधिक्य

  • सांगली - सुधीर गाडगीळ - भाजप  -३६,१३५
  • मिरज - सुरेश खाडे - भाजप - ४४,२७९
  • जत - गोपीचंद पडळकर - भाजप - ३७,१०३
  • शिराळा - सत्यजीत देशमुख - भाजप - २२,६२४
  • इस्लामपूर - जयंत पाटील - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार - ११,९११
  • तासगाव-कवठेमहांकाळ - रोहित पाटील - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार - २६,५७७
  • पलूस-कडेगाव - विश्वजीत कदम - काँग्रेस - २८,८२५
  • खानापूर - सुहास बाबर - शिंदेसेना - ७७,५२२

जयंतरावांचे मताधिक्य सर्वात कमी, सुहासचे सर्वाधिकजिल्ह्यात सर्वाधिक ७७ हजार ५२२ इतके मताधिक्य शिंदेसेनेचे सुहास बाबर यांना मिळाले, तर सर्वात कमी म्हणजे ११ हजार ९११ इतके मताधिक्य जयंत पाटील यांना मिळाले. आजवरच्या आठ निवडणुकांतील त्यांचे हे सर्वात कमी मताधिक्य नोंदले गेले.

विश्वजीत कदम यांचे मताधिक्यही घटलेविश्वजीत कदम यांना २०१९च्या निवडणुकीत १ लाख ५० हजार ८६६चे मताधिक्य होते. यंदा हे मताधिक्य २८ हजार ८२५ पर्यंत घटले. या ठिकाणी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी जोरदार लढत दिली.

आबांचे पुत्र जिंकलेसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात यंदा आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील यांच्यात लढत झाली. यात आर.आर. पाटील यांचे पुत्र विजयी झाले.

जिल्ह्यात २०१४ ची पुनरावृत्तीजिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला पाच तर युतीला तीन जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये नेमकी हीच परिस्थिती उलट होती. त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. तरीही भाजपाला ४, शिवसेनेला एक, काँग्रेसला १, तर राष्ट्रवादीला २ जागा जिंकता आल्या होत्या. विशेष म्हणजे २०१४ मध्ये ज्या चार मतदारसंघात भाजपाला यश मिळाले होते, त्याच मतदारसंघात यंदाही भाजपाने बाजी मारली.

पिता-पुत्राकडून पराभवसंजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याविरोधात नेहमीच निवडणूक लढवली. मात्र, त्यांना सतत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पश्चात आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्याशी झालेल्या लढतीतही ते पराभूत झाल्याने पिता-पुत्राकडून पराभूत होण्याची नोंद त्यांच्या कारकिर्दीत झाली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sangli-acसांगलीislampur-acइस्लामपूरpalus-kadegaon-acपलूस कडेगावtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024