शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

लोकमान्य टिळक हे राष्ट्राचे अमर आदर्श - मोहन भागवत

By शरद जाधव | Updated: December 17, 2023 13:25 IST

मोहन भागवत; सांगलीत लो. टिळक स्मारक मंदिर शताब्दी वर्ष प्रारंभ कार्यक्रम

सांगली : माणूस ज्या स्थानावर पोहोचतो ते त्याच्यामुळे नव्हेतर त्याच्या आचरणामुळे पोहोचत असतो. देश हितासाठी कार्य करताना नेहमीच हीच भावना ठेवून लोकमान्य टिळकांनी त्या काळात काम केले. त्यांच्या याच विचारधारेचा आदर्श घेऊन देशहितासाठी प्राधान्य दिले गेले. टिळकांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात. त्यामुळेच लोकमान्य टिळक हेच राष्ट्राचे अमर असे आदर्श आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी सांगलीत केले.

येथील लो. टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यास डॉ. भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले की, कोणतेही उद्दीष्ट मनात ठेवून कार्य केल्यास ती ध्येयप्राप्ती ही होतच असते. टिळकांचेही व्यक्तीमत्त्व असेच होते. त्यामुळे टिळकांचे देशहिताचे विचार तेव्हाही आणि आताही प्रेरणादायीच आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करतानाही डॉ. हेडगेवार यांच्यासमोर टिळकांचे विचार आदर्श होते. त्यांच्या आचरणातून शिकायला मिळाले असल्यानेही संघानेही देशहितासाठी कार्य केले. टिळकांनी स्वत:चा विचार न करता रूजवलेले विचार महत्वाचे होते. टिळकांचा काळ हा वेगळा असलातरी गुणसंपदेवर त्यांनी तो सार्थकी करून दाखविला होता. म्हणूनच त्यांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक आहेत. माणूस कधीही जूना होत नाही हेच यातून लक्षात येते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, स्मारक मंदिरच्या अध्यक्ष मनीषा काळे, प्रकाश बिरजे, विनायक काळे, श्रीहरी दाते, माणिकराव जाधव, माधव बापट, प्रकाश आपटे, सौरभ गोखले, अमृता गोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMohan Bhagwatमोहन भागवतLokmanya Tilakलोकमान्य टिळक