शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात! भाजपावर केला हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 23:07 IST

Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीने गुढी पाडव्यादिवशी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. 'राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाच्या उमेदवाराठी मैदानात उतरले आहेत.   

महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.  माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना पाटील यांनी प्रचाराबाबत सूचना दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी

"आपल्या मतदारसंघात आपल्या शेवटच्या मतदारापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे. आपल्या बुथवरील मतदानाचा अभ्यास करा.  आपला नवा उमेदवार शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचा आहे, आपल्या उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं आहे. तुमच्या घरी कोण चहा घेऊन गेले, असले प्रकार मला चालणार नाही. ते आले घरात बसले आम्ही काय करु. तसला धंदा जरा बंद करा', असा सज्जड दम जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे, आपल्या बुथवर प्लस मतदान झालं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करा, असंही पाटील म्हणाले. 

"काँग्रेसने काढलेल्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्या मतदारांना पटवून सांगा. आज आपल्या देशात अन्नधान्यावरही टॅक्स द्यावा लागतो. परवा लाईट बील वाढलं, जीएसटी १८ टक्के आहे. देशावर कर्ज २१० लाख कोटी रुपयांचे झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात हेच कर्ज ५६ लाख कोटी होते. हे कर्ज फेडण्यासाठी निवडणुकीनंतर १८ चे २१ टक्के केले तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. 

देशावर कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढले

"बँकेत पैसे अवाढव्य कापले जातात. मेसेज सुविधेसाठी दर महिन्याला १८ रुपये कापले जातात. स्टेट बँक ऑफ इंडियात ५० कोटी खाती आहेत.  क्रेडीट कार्डवरही दोन टक्के फी आहे. बाहेरच्या देशात सेवेला अर्धा टक्के आहे पण, आपल्या देशात दोन टक्के आहे. असं का तर २१० लाख कोटी कर्ज आहे त्या कर्जात देशातील धनिकांना, श्रीमंतांना, उद्योगपतींना २५ लाख कोटी रुपयांच्या सवलती कर्जमाफ्या दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत जो खड्डा पडला आहे तो भरुन काढण्यासाठी या बँकांची परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बँकांना या सर्व्हिस चार्जेस लावायचे सगळे अधिकार देण्यात आले आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे