शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात! भाजपावर केला हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 23:07 IST

Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीने गुढी पाडव्यादिवशी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. 'राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाच्या उमेदवाराठी मैदानात उतरले आहेत.   

महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.  माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना पाटील यांनी प्रचाराबाबत सूचना दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी

"आपल्या मतदारसंघात आपल्या शेवटच्या मतदारापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे. आपल्या बुथवरील मतदानाचा अभ्यास करा.  आपला नवा उमेदवार शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचा आहे, आपल्या उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं आहे. तुमच्या घरी कोण चहा घेऊन गेले, असले प्रकार मला चालणार नाही. ते आले घरात बसले आम्ही काय करु. तसला धंदा जरा बंद करा', असा सज्जड दम जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे, आपल्या बुथवर प्लस मतदान झालं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करा, असंही पाटील म्हणाले. 

"काँग्रेसने काढलेल्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्या मतदारांना पटवून सांगा. आज आपल्या देशात अन्नधान्यावरही टॅक्स द्यावा लागतो. परवा लाईट बील वाढलं, जीएसटी १८ टक्के आहे. देशावर कर्ज २१० लाख कोटी रुपयांचे झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात हेच कर्ज ५६ लाख कोटी होते. हे कर्ज फेडण्यासाठी निवडणुकीनंतर १८ चे २१ टक्के केले तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. 

देशावर कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढले

"बँकेत पैसे अवाढव्य कापले जातात. मेसेज सुविधेसाठी दर महिन्याला १८ रुपये कापले जातात. स्टेट बँक ऑफ इंडियात ५० कोटी खाती आहेत.  क्रेडीट कार्डवरही दोन टक्के फी आहे. बाहेरच्या देशात सेवेला अर्धा टक्के आहे पण, आपल्या देशात दोन टक्के आहे. असं का तर २१० लाख कोटी कर्ज आहे त्या कर्जात देशातील धनिकांना, श्रीमंतांना, उद्योगपतींना २५ लाख कोटी रुपयांच्या सवलती कर्जमाफ्या दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत जो खड्डा पडला आहे तो भरुन काढण्यासाठी या बँकांची परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बँकांना या सर्व्हिस चार्जेस लावायचे सगळे अधिकार देण्यात आले आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे