शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात! भाजपावर केला हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 23:07 IST

Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीने गुढी पाडव्यादिवशी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. 'राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाच्या उमेदवाराठी मैदानात उतरले आहेत.   

महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.  माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना पाटील यांनी प्रचाराबाबत सूचना दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी

"आपल्या मतदारसंघात आपल्या शेवटच्या मतदारापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे. आपल्या बुथवरील मतदानाचा अभ्यास करा.  आपला नवा उमेदवार शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचा आहे, आपल्या उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं आहे. तुमच्या घरी कोण चहा घेऊन गेले, असले प्रकार मला चालणार नाही. ते आले घरात बसले आम्ही काय करु. तसला धंदा जरा बंद करा', असा सज्जड दम जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे, आपल्या बुथवर प्लस मतदान झालं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करा, असंही पाटील म्हणाले. 

"काँग्रेसने काढलेल्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्या मतदारांना पटवून सांगा. आज आपल्या देशात अन्नधान्यावरही टॅक्स द्यावा लागतो. परवा लाईट बील वाढलं, जीएसटी १८ टक्के आहे. देशावर कर्ज २१० लाख कोटी रुपयांचे झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात हेच कर्ज ५६ लाख कोटी होते. हे कर्ज फेडण्यासाठी निवडणुकीनंतर १८ चे २१ टक्के केले तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. 

देशावर कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढले

"बँकेत पैसे अवाढव्य कापले जातात. मेसेज सुविधेसाठी दर महिन्याला १८ रुपये कापले जातात. स्टेट बँक ऑफ इंडियात ५० कोटी खाती आहेत.  क्रेडीट कार्डवरही दोन टक्के फी आहे. बाहेरच्या देशात सेवेला अर्धा टक्के आहे पण, आपल्या देशात दोन टक्के आहे. असं का तर २१० लाख कोटी कर्ज आहे त्या कर्जात देशातील धनिकांना, श्रीमंतांना, उद्योगपतींना २५ लाख कोटी रुपयांच्या सवलती कर्जमाफ्या दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत जो खड्डा पडला आहे तो भरुन काढण्यासाठी या बँकांची परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बँकांना या सर्व्हिस चार्जेस लावायचे सगळे अधिकार देण्यात आले आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे