शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कृष्णेचा फुगवटा वाढला, हिप्परगी बॅरेजचे दरवाजे उघडा; जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाचे कर्नाटकला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:59 IST

बॅरेजमुळे कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या आठवडाभरापासून धो-धो पाऊस कोसळत असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. ती नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाने कर्नाटक जल प्राधिकरणाला पत्र दिले असून, हिप्परगी बॅरेजचे सर्व म्हणजे २२ दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे.सांगलीच्या उपअधीक्षक अभियंत्यांनी कर्नाटक जल प्राधिकरणाच्या अथणी कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना मेलद्वारे कृष्णा नदीच्या वाढत्या पाणीपातळीची माहिती दिली आहे. पत्रात म्हटले आहे की, कृष्णा नदीची वाढती पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा प्रवाह पुढे गतिमान होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व दरवाजे पूर्ण क्षमतेने खुले करावेत. सांगली, सातारा जिल्ह्यांतील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नद्यांत पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. साहजिकच कृष्णेची पाणीपातळी वाढू शकते. ती नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी पुढे जाणे आवश्यक आहे.रविवारी सकाळी राजापूर बंधाऱ्यामध्ये कृष्णेची पाणीपातळी २९ फूट ४ इंच होती. सांगलीत आयर्विन पुजावळ १८ फूट होती. आयर्विन पुलापासून २६ हजार २४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, राजापूर बंधाऱ्यातून ६९ हजार ३३३ क्युसेक गतीने पाणी कर्नाटकात जात आहे. सांगली परिमंडळाने पत्रात म्हटले आहे की, पाण्याचे वाढते प्रमाण पाहता हिप्परगी बॅरेजमध्ये साठा करुन ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच बॅरेजचे सर्व दरवाजे उघडून पाणी पुढे सोडावे.महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मुख्य सचिवांची १६ व २९ मे रोजी बैठक झाली होती, त्यातील निर्णयानुसार पावसाळ्यात कृष्णा नदी पूर्ण क्षमतेने, कोणत्याही अडथळ्याशिवाय मुक्तपणे वाहती ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळेच हिप्परगी बॅरेजमध्ये पाणीसाठा करू नये. सर्व दरवाजे उघडावेत.

अलमट्टी नव्हे, हिप्परगीमुळे फुगवटादरम्यान, कृष्णा नदीच्या फुगवट्याला व सांगलीतील महापुराला अलमट्टी धरण कारणीभूत नसून, हिप्परगी बॅरेजमधील पाणीसाठाच कारणीभूत असल्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे या पत्रावरून स्पष्ट होते. हिप्परगी बॅरेजमध्ये पाणी अडवून ठेवल्याने मागे कृष्णा नदीची पाणीपातळी फुगत जाते, पाण्याचा प्रवाह मंदावते आणि सांगलीला महापुराचा तडाखा बसतो, असा निष्कर्ष या पत्रातून निघाल्याशिवाय राहत नाही. रविवारी सकाळपर्यंत अलमट्टी धरणात ९७.५५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याविषयी परिमंडळाने या पत्रातून कोणताही आक्षेप घेतलेला नाही.