शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेचा फुगवटा वाढला, हिप्परगी बॅरेजचे दरवाजे उघडा; जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाचे कर्नाटकला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:59 IST

बॅरेजमुळे कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या आठवडाभरापासून धो-धो पाऊस कोसळत असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. ती नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाने कर्नाटक जल प्राधिकरणाला पत्र दिले असून, हिप्परगी बॅरेजचे सर्व म्हणजे २२ दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे.सांगलीच्या उपअधीक्षक अभियंत्यांनी कर्नाटक जल प्राधिकरणाच्या अथणी कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना मेलद्वारे कृष्णा नदीच्या वाढत्या पाणीपातळीची माहिती दिली आहे. पत्रात म्हटले आहे की, कृष्णा नदीची वाढती पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा प्रवाह पुढे गतिमान होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व दरवाजे पूर्ण क्षमतेने खुले करावेत. सांगली, सातारा जिल्ह्यांतील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नद्यांत पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. साहजिकच कृष्णेची पाणीपातळी वाढू शकते. ती नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी पुढे जाणे आवश्यक आहे.रविवारी सकाळी राजापूर बंधाऱ्यामध्ये कृष्णेची पाणीपातळी २९ फूट ४ इंच होती. सांगलीत आयर्विन पुजावळ १८ फूट होती. आयर्विन पुलापासून २६ हजार २४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, राजापूर बंधाऱ्यातून ६९ हजार ३३३ क्युसेक गतीने पाणी कर्नाटकात जात आहे. सांगली परिमंडळाने पत्रात म्हटले आहे की, पाण्याचे वाढते प्रमाण पाहता हिप्परगी बॅरेजमध्ये साठा करुन ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच बॅरेजचे सर्व दरवाजे उघडून पाणी पुढे सोडावे.महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मुख्य सचिवांची १६ व २९ मे रोजी बैठक झाली होती, त्यातील निर्णयानुसार पावसाळ्यात कृष्णा नदी पूर्ण क्षमतेने, कोणत्याही अडथळ्याशिवाय मुक्तपणे वाहती ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळेच हिप्परगी बॅरेजमध्ये पाणीसाठा करू नये. सर्व दरवाजे उघडावेत.

अलमट्टी नव्हे, हिप्परगीमुळे फुगवटादरम्यान, कृष्णा नदीच्या फुगवट्याला व सांगलीतील महापुराला अलमट्टी धरण कारणीभूत नसून, हिप्परगी बॅरेजमधील पाणीसाठाच कारणीभूत असल्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे या पत्रावरून स्पष्ट होते. हिप्परगी बॅरेजमध्ये पाणी अडवून ठेवल्याने मागे कृष्णा नदीची पाणीपातळी फुगत जाते, पाण्याचा प्रवाह मंदावते आणि सांगलीला महापुराचा तडाखा बसतो, असा निष्कर्ष या पत्रातून निघाल्याशिवाय राहत नाही. रविवारी सकाळपर्यंत अलमट्टी धरणात ९७.५५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याविषयी परिमंडळाने या पत्रातून कोणताही आक्षेप घेतलेला नाही.