शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

एलईडी दिव्यांच्या प्रकल्प तोट्याचा ठरणार, सांगली महापालिकेचे कोट्यवधी रुपये बुडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:33 IST

सांगली : महापालिका क्षेत्रातील एलईडी दिव्यांच्या प्रकल्पासाठी ‘समुद्रा’ कंपनीला दरवर्षी ३५ कोटी रुपयांप्रमाणे १५ वर्षांत ५०० कोटी रुपये देण्याचा ...

सांगली : महापालिका क्षेत्रातील एलईडी दिव्यांच्या प्रकल्पासाठी ‘समुद्रा’ कंपनीला दरवर्षी ३५ कोटी रुपयांप्रमाणे १५ वर्षांत ५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय तोट्याचा असल्याचे मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केले. कंपनीशी केलेल्या कराराचा सखोल व कायदेशीर अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच मुदतीत दिवे न बसविल्याने तसेच इतर तक्रारीमुळे ‘समुद्रा’ कंपनीला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येईल, असे सांगण्यात आले.महापालिकेच्या स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाबाबत आयुक्त गांधी यांच्या उपस्थितीत अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त विजया यादव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमर चव्हाण, कंपनीचे प्रतिनिधी तुषार पेंढे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.आयुक्त गांधी यांनी स्मार्ट एलईडी प्रकल्पाची प्राथमिक माहिती देण्यात आली. ‘समुद्रा’ शी महापालिकेने कायदेशीर करार केला आहे. करारातील अटी व शर्तीनुसार कंपनीला दरमहा ६० लाख रुपये वीज बिल व अन्य रक्कम असे तीन ते साडेतीन कोटी रुपये द्यायचे आहे. वार्षिक सुमारे ३५ कोटी रुपये द्यावे लागतात. कंपनीने एकदाच ३५ ते ४० कोटी रुपये प्रकल्पात गुंतवले आहेत. एवढ्या गुंतवणुकीवर त्यांना पंधरा वर्षांत सुमारे ५०० कोटींची रक्कम मिळणार असेल तर महापालिकेला मोठा तोटा होणार असल्याचे दिसते, असे मत आयुक्त गांधी यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती मिळाली.पोर्टल कार्यरत नाहीपथदिव्यांचा प्रकल्प सुरू होऊन तीन वर्षे झाली आहेत. सेंट्रलाइज्ड कंट्रोल ॲंड मोनोटोरिंग सिस्टिम, ऑनलाइन पोर्टल कंपनीने कार्यान्वित केलेले नाही. करारानुसार प्रकल्प वर्षात पूर्ण झाला नाही. दोनवेळा मुदतवाढ दिली. अद्याप ५४०० पथदिवे बसवलेले नाहीत. पथदिवा निकामी झाल्यास २४ तासांत सुरू करणे बंधनकारक आहे. अन्यथा दिवसाला शंभर रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. परंतु, पोर्टलच नसल्याने कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्याची सूचना केली.

‘समुद्रा’बाबत तक्रारींचा महापूरसमुद्राने महापालिका क्षेत्रात ४२ हजार ५९७ एलईडी दिवे बसवले आहेत. अद्याप ५ हजार ४०० दिवे बसवले नाहीत. त्या कामाची मुदत संपली आहे. तसेच बसवलेल्या पथदिव्यांपैकी सुमारे दोन हजार दिवे बंद असल्याचा अंदाज आहे. हे समजणारी ऑनलाइन यंत्रणाचा कंपनीने कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे तक्रारींचा महापूर महापालिकेकडे येत आहे.

टॅग्स :Sangliसांगली