शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

एलईडी दिव्यांच्या प्रकल्प तोट्याचा ठरणार, सांगली महापालिकेचे कोट्यवधी रुपये बुडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:33 IST

सांगली : महापालिका क्षेत्रातील एलईडी दिव्यांच्या प्रकल्पासाठी ‘समुद्रा’ कंपनीला दरवर्षी ३५ कोटी रुपयांप्रमाणे १५ वर्षांत ५०० कोटी रुपये देण्याचा ...

सांगली : महापालिका क्षेत्रातील एलईडी दिव्यांच्या प्रकल्पासाठी ‘समुद्रा’ कंपनीला दरवर्षी ३५ कोटी रुपयांप्रमाणे १५ वर्षांत ५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय तोट्याचा असल्याचे मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केले. कंपनीशी केलेल्या कराराचा सखोल व कायदेशीर अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच मुदतीत दिवे न बसविल्याने तसेच इतर तक्रारीमुळे ‘समुद्रा’ कंपनीला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येईल, असे सांगण्यात आले.महापालिकेच्या स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाबाबत आयुक्त गांधी यांच्या उपस्थितीत अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त विजया यादव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमर चव्हाण, कंपनीचे प्रतिनिधी तुषार पेंढे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.आयुक्त गांधी यांनी स्मार्ट एलईडी प्रकल्पाची प्राथमिक माहिती देण्यात आली. ‘समुद्रा’ शी महापालिकेने कायदेशीर करार केला आहे. करारातील अटी व शर्तीनुसार कंपनीला दरमहा ६० लाख रुपये वीज बिल व अन्य रक्कम असे तीन ते साडेतीन कोटी रुपये द्यायचे आहे. वार्षिक सुमारे ३५ कोटी रुपये द्यावे लागतात. कंपनीने एकदाच ३५ ते ४० कोटी रुपये प्रकल्पात गुंतवले आहेत. एवढ्या गुंतवणुकीवर त्यांना पंधरा वर्षांत सुमारे ५०० कोटींची रक्कम मिळणार असेल तर महापालिकेला मोठा तोटा होणार असल्याचे दिसते, असे मत आयुक्त गांधी यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती मिळाली.पोर्टल कार्यरत नाहीपथदिव्यांचा प्रकल्प सुरू होऊन तीन वर्षे झाली आहेत. सेंट्रलाइज्ड कंट्रोल ॲंड मोनोटोरिंग सिस्टिम, ऑनलाइन पोर्टल कंपनीने कार्यान्वित केलेले नाही. करारानुसार प्रकल्प वर्षात पूर्ण झाला नाही. दोनवेळा मुदतवाढ दिली. अद्याप ५४०० पथदिवे बसवलेले नाहीत. पथदिवा निकामी झाल्यास २४ तासांत सुरू करणे बंधनकारक आहे. अन्यथा दिवसाला शंभर रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. परंतु, पोर्टलच नसल्याने कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्याची सूचना केली.

‘समुद्रा’बाबत तक्रारींचा महापूरसमुद्राने महापालिका क्षेत्रात ४२ हजार ५९७ एलईडी दिवे बसवले आहेत. अद्याप ५ हजार ४०० दिवे बसवले नाहीत. त्या कामाची मुदत संपली आहे. तसेच बसवलेल्या पथदिव्यांपैकी सुमारे दोन हजार दिवे बंद असल्याचा अंदाज आहे. हे समजणारी ऑनलाइन यंत्रणाचा कंपनीने कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे तक्रारींचा महापूर महापालिकेकडे येत आहे.

टॅग्स :Sangliसांगली