शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

आघाडी लढतेय राष्ट्रीय धोरणावर, भाजप स्थानिक प्रश्नावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 16:48 IST

Politics Sangli : कोरोना काळातील कामाबरोबरच लोकांचे प्रश्न मांडून राजकीय पटलावरील आपले स्थान बळकट करण्यासाठी सर्वच पक्षांची सध्या धडपड सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी स्वतंत्रपणे केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलने करत आहे, तर भाजपने राज्याच्या विशेषत: स्थानिक प्रश्नांवर आंदोलनांचा सपाटा लावला आहे.

ठळक मुद्देआघाडी लढतेय राष्ट्रीय धोरणावर, भाजप स्थानिक प्रश्नावरआंदोलनांचा सपाटा : लोकांचे लक्ष वेधण्यासाठी नेत्यांची धडपड

सांगली : कोरोना काळातील कामाबरोबरच लोकांचे प्रश्न मांडून राजकीय पटलावरील आपले स्थान बळकट करण्यासाठी सर्वच पक्षांची सध्या धडपड सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी स्वतंत्रपणे केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलने करत आहे, तर भाजपने राज्याच्या विशेषत: स्थानिक प्रश्नांवर आंदोलनांचा सपाटा लावला आहे.इंधन, गॅस दरवाढीसारखे मुद्दे घेऊन सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी वेगवेगळी आंदोलने करत आहेत. स्थानिक पातळीवर महापालिकेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थानी आहे. राज्यातही महाविकास आघाडी सत्तेत आहे. त्यामुळे लढायला केवळ केंद्र शासनाचा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे. याशिवाय इंधन, गॅस दरवाढ, महागाई, बेरोजगारी अशा विषयांचे आयते कुरण केंद्र शासनाने दिले आहे. या प्रश्नांवरुन आघाडीने भाजप नेत्यांची कोंडी केली आहे. लोकांसमोर जाताना त्यांना या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे.दुसरीकडे केंद्र शासनाविरोधात सुरु असलेली दरवाढ, महागाईची ओरड दुर्लक्षित करण्यासाठी भाजपने आता राज्य शासन, विशेषत: स्थानिक प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळात रुग्णांची लूट, रुग्णांचे मृत्यू, हलगर्जीपणा या गोष्टींवरुन आंदोलने केली जात आहेत. राज्य शासनाच्या धोरणांविरोधातही भाजप आंदोलन, विरोध करत आहे.

आरक्षणाचा मुद्दाही सर्वच राजकीय पक्षांच्या पटलावर असला तरी त्यात सावध भूमिका दिसून येते. यात सर्वच पक्ष सध्या अडचणीत सापडले आहेत. हा मुद्दा केंद्र व राज्य दोन्हींच्या अखत्यारित असल्याने राजकारणी जपून पावले टाकत आहेत. सध्या आंदोलनांचा जिल्ह्यात धडाका सुरु आहे. प्रत्येक पक्ष आंदोलनात उतरुन आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे.लसीच्या प्रश्नाकडेही दुर्लक्षजिल्ह्यात सध्या लसीचा तुटवडा आहे. लस मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे, मात्र याबद्दल सर्वपक्षीय राजकारणी सध्या शांत आहेत. केंद्र शासन व राज्य शासन दोघांचेही गैरनियोजन यात दिसत असल्याने याबाबत सत्ताधारी व विरोधक मौन बाळगत आहेत.कोरोनातील व्याप कमी झालाकोरोना काळात ऑक्सिजन, बेडची टंचाई असताना सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते सामाजिक कामात व्यस्त होते. मात्र, आता हा व्याप कमी झाल्याने ते राजकीय मैदानात ताकद आजमावू लागले आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस