शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

सांगली जिल्ह्यातील नेत्यांकडून राज्याच्या राजकारणाला दिशा - राहुल नार्वेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:14 IST

मिरज : वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला ...

मिरज : वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला दिशा दिली. विधानसभेत प्रभावीपणे विचार मांडून जनतेसाठी काम करणारे नेते सांगली जिल्ह्याने दिले. हा समृद्ध राजकीय वारसा जपून लोकप्रतिनिधींनी समाजासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिरजेत केले.मिरजेत जिल्हा समस्त ब्राह्मण समाजातर्फे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार नार्वेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मिरज संस्थानचे गंगाधरराव तथा बाळासाहेब पटवर्धन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.नार्वेकर म्हणाले, विशाल पाटील यांच्यासारखे तरुण खासदार जिल्ह्याला मिळाले आहेत. आजवरचा राजकीय वारसा पाहता जिल्ह्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. राज्याच्या विधिमंडळाची ओळख ही प्रगल्भ लोकप्रतिनिधींमुळे होत असते. असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील ब्राम्हण समाजाने प्रभाव निर्माण केला. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे धोरण असल्याचे सांगितले. किशोर पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.इतरांना शिव्या देऊन मोठे व्हायची फॅशनसद्या इतरांना शिव्या देऊन समाजात मोठे व्हायची फॅशन सुरू झाली आहे. एखाद्या समाजाबद्दल द्वेष व्यक्त करणे चुकीचे आहे. आपण सगळे मराठी आहोत. पाचशे वर्षांपूर्वीचा हजार वर्षांपूर्वीचा दावा काढून एखाद्याला जोडत बसायचं हे अयोग्य असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRahul Narvekarराहुल नार्वेकरJayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील