शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर 

By अविनाश कोळी | Updated: July 10, 2023 17:33 IST

ग्रीनफिल्डच्या नावावर निसर्गाच्या विपरित कामे

सांगली : कृष्णा व पंचगंगा नदीवर २०२१ पर्यंत २२ पूल अस्तित्वात आले. आता नव्याने आणखी पूल उभारले जात आहेत. दोन्ही नद्यांना सतत महापूर येत असताना इतके पूल उभारून जलप्रवाहात अडथळे निर्माण केले जात आहेत. मानव आणि निसर्गाला जोडणारे नव्हे तर त्यांना तोडणारे हे पूल आहेत, असे स्पष्ट मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, कृष्णा व पंचगंगा नदीच्या महापुराचा अभ्यास आम्ही केला होता. केवळ एक अशासकीय संस्था म्हणून आमचा अहवाल तत्कालीन सरकारमधील अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे आजही महापूर नियंत्रणासाठी संस्थांव्यक्तिरिक्त शासकीय पातळीवर कोणतेही काम होताना दिसत नाही. याउलट आपत्ती वाढविण्यास कारणीभूत असणारे निर्णय घेतले जात आहेत. नदीतील वाळू उपसा, नद्यांवर पूल उभारणी, ओढे, नाले यांच्यात भराव टाकून केले जाणारे रस्ते, नद्यांचे खोलीकरण या सर्व गोष्टी निसर्गचक्र बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहेत.नदीकाठची निळी व लाल पूररेषा आम्ही नेहमी ऐकत होताे. कोल्हापुरात हिरवी रेषा शोधून काढली गेली. ही दिशाभूल आहे. हरित (ग्रीनफिल्ड) महामार्ग, हरित विमानतळ, हरित प्रकल्प अशा नावाने दिशाभूल करून निसर्गाच्या विपरित कामे केली जात आहेत. अशा विकासकामांच्या माध्यमातून जलस्रोत व नैसर्गिक संपदा नष्ट केली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीenvironmentपर्यावरणriverनदीMedha Patkarमेधा पाटकर