शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कृष्णा, पंचगंगा नदीवर एवढे पूल कशासाठी हवेत? - मेधा पाटकर 

By अविनाश कोळी | Updated: July 10, 2023 17:33 IST

ग्रीनफिल्डच्या नावावर निसर्गाच्या विपरित कामे

सांगली : कृष्णा व पंचगंगा नदीवर २०२१ पर्यंत २२ पूल अस्तित्वात आले. आता नव्याने आणखी पूल उभारले जात आहेत. दोन्ही नद्यांना सतत महापूर येत असताना इतके पूल उभारून जलप्रवाहात अडथळे निर्माण केले जात आहेत. मानव आणि निसर्गाला जोडणारे नव्हे तर त्यांना तोडणारे हे पूल आहेत, असे स्पष्ट मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, कृष्णा व पंचगंगा नदीच्या महापुराचा अभ्यास आम्ही केला होता. केवळ एक अशासकीय संस्था म्हणून आमचा अहवाल तत्कालीन सरकारमधील अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे आजही महापूर नियंत्रणासाठी संस्थांव्यक्तिरिक्त शासकीय पातळीवर कोणतेही काम होताना दिसत नाही. याउलट आपत्ती वाढविण्यास कारणीभूत असणारे निर्णय घेतले जात आहेत. नदीतील वाळू उपसा, नद्यांवर पूल उभारणी, ओढे, नाले यांच्यात भराव टाकून केले जाणारे रस्ते, नद्यांचे खोलीकरण या सर्व गोष्टी निसर्गचक्र बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहेत.नदीकाठची निळी व लाल पूररेषा आम्ही नेहमी ऐकत होताे. कोल्हापुरात हिरवी रेषा शोधून काढली गेली. ही दिशाभूल आहे. हरित (ग्रीनफिल्ड) महामार्ग, हरित विमानतळ, हरित प्रकल्प अशा नावाने दिशाभूल करून निसर्गाच्या विपरित कामे केली जात आहेत. अशा विकासकामांच्या माध्यमातून जलस्रोत व नैसर्गिक संपदा नष्ट केली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीenvironmentपर्यावरणriverनदीMedha Patkarमेधा पाटकर