शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सांगलीत तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला : सतर्कतेमुळे साताऱ्यात सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 8:27 PM

‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला.

ठळक मुद्देमुंबईला घेऊन जाणारा संशयितही ताब्यात

सांगली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात खेळणा-या तीन अल्पवयीन मुलांना आमिष दाखवून रेल्वेतून घेऊन जाणा-या संशयितास शिताफीने पकडण्यात आले. नागरिकांची सतर्कता आणि विश्रामबाग व सातारा पोलिसांच्या समन्वयामुळे रात्रीतच साता-यातून तीन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. रमेश श्रीरंग झेंडे (वय २५, रा. बलवडी, ता. खानापूर, सध्या घाटकोपर, मुंबई) असे पकडण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.

 

शहरातील हनुमाननगर परिसरातील तीन मुले बुधवारी सायंकाळी फिरत फिरत सांगलीतील रेल्वेस्थानक परिसरात गेली होती. याचवेळी मुंबईला जाण्यासाठी संशयित रमेश झेंडे रेल्वे स्थानकावर आला होता. तीन मुलांशी बोलत असताना त्याने त्यातील एका मुलास, ‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला.

सायंकाळपासून मुले घरी नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर मुलांच्या पालकांनी नगरसेवक अभिजित भोसले यांच्याशी संपर्क साधून झालेली घटना सांगितली. त्यानंतर तरुणांनी गट करून शहरात त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान मुलांच्या पालकांनी विश्रामबाग पोलिसात मुले बेपत्ता असल्याबाबत माहिती दिली.

शोधमोहीम सुरू असतानाच रात्री अकराच्या सुमारास माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे यांनी नगरसेवक भोसले यांना मोबाईलवरून हनुमाननगर येथील तीन मुले महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून संदिग्धपणे प्रवास करत असल्याची व त्यांच्यासोबत एक संशयित असल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने संपर्क साधून या रेल्वेगाडीतील मार्गरक्षक असलेल्या विकास भोले यांनाही कळविले. दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, रमेश तावरे व संदीप घस्ते यांनी सातारा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत तीन मुलांच्या अपहरणाची माहिती दिली. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानकावर मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली व रमेश झेंडेला ताब्यात घेण्यात आले. तसा संदेश मिळताच पोलिस पथक, पालक आणि भोसले साता-याला गेले. तेथे मुलांना ताब्यात घेण्यात आले.अपहरणाचे कारण अस्पष्टतीन मुलांना मुंबईला घेऊन जाणारा संशयित रमेश झेंडे मूळचा बलवडीचा असला तरी मुंबई महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समजते. तो स्वभावाने विक्षिप्त असल्याने तीन मुलांना घेऊन जाण्यामागचा त्याचा नेमका हेतू काय होता, याबाबत अस्पष्टता होती.

 

टॅग्स :ThiefचोरChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाSangliसांगलीSatara areaसातारा परिसर