शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सांगलीत तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला : सतर्कतेमुळे साताऱ्यात सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:28 IST

‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला.

ठळक मुद्देमुंबईला घेऊन जाणारा संशयितही ताब्यात

सांगली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात खेळणा-या तीन अल्पवयीन मुलांना आमिष दाखवून रेल्वेतून घेऊन जाणा-या संशयितास शिताफीने पकडण्यात आले. नागरिकांची सतर्कता आणि विश्रामबाग व सातारा पोलिसांच्या समन्वयामुळे रात्रीतच साता-यातून तीन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. रमेश श्रीरंग झेंडे (वय २५, रा. बलवडी, ता. खानापूर, सध्या घाटकोपर, मुंबई) असे पकडण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.

 

शहरातील हनुमाननगर परिसरातील तीन मुले बुधवारी सायंकाळी फिरत फिरत सांगलीतील रेल्वेस्थानक परिसरात गेली होती. याचवेळी मुंबईला जाण्यासाठी संशयित रमेश झेंडे रेल्वे स्थानकावर आला होता. तीन मुलांशी बोलत असताना त्याने त्यातील एका मुलास, ‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला.

सायंकाळपासून मुले घरी नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर मुलांच्या पालकांनी नगरसेवक अभिजित भोसले यांच्याशी संपर्क साधून झालेली घटना सांगितली. त्यानंतर तरुणांनी गट करून शहरात त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान मुलांच्या पालकांनी विश्रामबाग पोलिसात मुले बेपत्ता असल्याबाबत माहिती दिली.

शोधमोहीम सुरू असतानाच रात्री अकराच्या सुमारास माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे यांनी नगरसेवक भोसले यांना मोबाईलवरून हनुमाननगर येथील तीन मुले महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून संदिग्धपणे प्रवास करत असल्याची व त्यांच्यासोबत एक संशयित असल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने संपर्क साधून या रेल्वेगाडीतील मार्गरक्षक असलेल्या विकास भोले यांनाही कळविले. दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, रमेश तावरे व संदीप घस्ते यांनी सातारा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत तीन मुलांच्या अपहरणाची माहिती दिली. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानकावर मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली व रमेश झेंडेला ताब्यात घेण्यात आले. तसा संदेश मिळताच पोलिस पथक, पालक आणि भोसले साता-याला गेले. तेथे मुलांना ताब्यात घेण्यात आले.अपहरणाचे कारण अस्पष्टतीन मुलांना मुंबईला घेऊन जाणारा संशयित रमेश झेंडे मूळचा बलवडीचा असला तरी मुंबई महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समजते. तो स्वभावाने विक्षिप्त असल्याने तीन मुलांना घेऊन जाण्यामागचा त्याचा नेमका हेतू काय होता, याबाबत अस्पष्टता होती.

 

टॅग्स :ThiefचोरChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाSangliसांगलीSatara areaसातारा परिसर