शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खानापूर विधानसभेचा दुष्काळ मंत्रिपदाच्या संधीमुळे संपणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 19:43 IST

खानापूर विधानसभा मतदार संघातील दोन सुपुत्र आमदार 

लक्ष्मण सरगरआटपाडी : महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असे यश प्राप्त झाले आहे. त्या दोनच दिवसांमध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार असून या मंत्रिमंडळामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ आमदार गोपीचंद पडळकर व सुहास बाबर यांच्या रूपाने संपणार का? याबाबत आटपाडी व खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जागेवर महायुतीने यश मिळवले आहे. गेल्या अनेक तपाहून अधिक काळ दुष्काळी भागातील जत व आटपाडी, खानापूर तालुक्यामध्ये मंत्रिपदाची संधी विविध सरकारच्या काळामध्ये मिळालीच नाही. सध्या भाजपाचे बहुजन समाजाचे नेतृत्व आटपाडीचे सुपुत्र गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात भाजपा पक्ष वाढीसाठी व ओबीसी समाजाची मोट बांधण्यात गोपीचंद पडळकरांचा मोठा वाटा आहे. ओबीसी नेतृत्व, सर्व घटकांच्यासाठी काम करण्याची तळमळ, संपूर्ण महाराष्ट्रात असलेली क्रेझ पाहता त्यांना मंत्रिमंडळात संधी पक्की असल्याचे समजते.शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी मोठा विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अतिशय विश्वासू शिलेदार असलेले दिवंगत आमदार अनिल बाबर यांची मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी शक्यता अनेकवेळा वर्तवली जात होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामध्ये अनिल बाबर यांनी प्रथम साथ देत दुष्काळी भागासाठी पाणी योजना पूर्ण करण्याची तळमळ व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना मंत्रिपद देऊन पक्ष वाढीसाठी व दुष्काळी पट्ट्यातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

दरम्यान, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही सुपुत्र एकाचवेळी आमदार म्हणून निवडून आले असून दोन्ही वेगळ्या पक्षाचे आहेत. दोन्हींच्या रूपात खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khanapur-acखानापूरGopichand Padalkarगोपीचंद पडळकरministerमंत्री