शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..अन्यथा कर्नाटकात जाऊ!, उमदी येथे पाणी संघर्ष समितीने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 17:41 IST

शिंदे सरकारने आमची दखल घेतली नाही तर आम्ही कर्नाटकात जायला तयार

उमदी : जर महाराष्ट्र शासनाने आम्हाला पाणी नाही दिले, तर आम्ही कर्नाटकात जाऊ, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी शुक्रवारी येथे दिला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुका कर्नाटकात घेण्याबाबत केलेल्या विधानानंतर जत तालुक्यात पाणीप्रश्नावरून वादंग निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी संघर्ष समितीची उमदी येथे सभा झाली.समितीचे अध्यक्ष पोतदार म्हणाले, अनेक वर्षे आम्ही पाण्यासाठी संघर्ष करत आहोत. मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्याने घेतले नाही. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जत पूर्व भागातील ४२ गावे कर्नाटकात घेणार, असे म्हणताच महाराष्ट्र शासन व विरोधी नेते जागे झाले. मात्र तुम्ही आम्हाला पाणी कधी देणार, हे उमदीत येऊन सांगा, अन्यथा आम्ही पुन्हा नव्याने प्रस्ताव घेऊन कर्नाटकात जाऊ. आम्ही पाकिस्तानात जात नाही, तर शेजारच्या राज्यातच जात आहोत. आमच्या भावना कर्नाटक सरकारला कळतात, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना का समजत नाहीत?अनिल शिंदे म्हणाले, पाणी मिळाले नाही तर आम्ही शांत बसणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही किती आंदोलन केली, याचा अभ्यास करा. लोकांच्या भावना समजून घ्या. आम्ही तुम्हाला फक्त पाणी मागत आहोत. तुम्ही आम्हाला पाणी नाही दिले, तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहाेत.ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर म्हणाले, जयंत पाटील यांनी जलसंपदा मंत्री असताना सहा टीएमसी पाणी मंजूर केले आहे. मात्र पाणी येणार तेवढ्यात सरकार कोसळो आणि कामाला खीळ बसली. शिंदे सरकारने आमची दखल घेतली नाही तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहाेत.निवृत्ती शिंदे म्हणाले, आमदार विक्रम सावंत यांच्या विनंतीनुसार कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील त्यांच्यासाठी अतिरिक्त ठरलेले पाणी आम्हाला सोडतात. कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते. वीज सवलत देते. महाराष्ट्राने आमच्या पाण्याची व्यवस्था नाही केली तर आम्ही रिट दाखल करून जनआंदोलन उभारू व कर्नाटकात जाऊ. यावेळी वहाब मुल्ला, मानसिद्ध पुजारी, नारायण ऐवळे, आण्णाप्पा आडवी, राजू कोळगिरी, दावल शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकjat-acजाटWaterपाणी