शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी उंचीवरुन महाराष्ट्र-कर्नाटकात संघर्ष, कर्नाटक सरकारचा गॅझेट अधिसूचनेसाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:59 IST

महाराष्ट्र सरकार कायदेशीर मार्गाने लढत नसल्याची अनेकांना खत

सुशांत घोरपडेम्हैसाळ : अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या भूमिकेला महाराष्ट्राने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या भूमिकेमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.कर्नाटक शासनातर्फे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केलं आहे की, धरण उंचीवाढीचा निर्णय हा २०१० मधील न्यायाधिकरणाच्या निर्णयावर आधारित असून तो आमचा हक्क आहे. यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांनी दिल्लीतील केंद्रीय जलशक्ती मंत्रालय तसेच प्रमुख नेत्यांना भेटून गॅझेट अधिसूचनेसाठी प्रयत्न सुरू केल्याचेही स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कोणताही निर्णय महाराष्ट्राच्या सहमतीशिवाय घेऊ नये. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दरवर्षी गंभीर पूरस्थिती निर्माण होते. याबाबत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार ही केला आहे. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी यांच्या सह अनेक संघटना या लढ्यासाठी एकत्र आल्या. आंदोलन केले मात्र शासन कायदेशीर मार्गाने लढत नसल्याची खंत अनेक संघटनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मांडत आहेत.

स्थानिक प्रतिनिधींचा विरोधया पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले आहेत. खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम आदींनी एकत्र येऊन केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, धरणाची उंची ५१५ मीटरपेक्षा अधिक वाढवू नये, अशी मागणी केली आहे. कोल्हापूर–सांगली मार्गांवर चक्काजाम आंदोलन करत नागरिकांनीही या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

तांत्रिक अहवालांमधील मतभेदमहाराष्ट्र सरकारने २०२० मध्ये नेमलेली नंदकुमार वाडनेरे समिती म्हणते की, अलमट्टी धरणामुळे पूरस्थिती निर्माण होत नसून, इतर भौगोलिक कारणे त्यामागे आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय आणि स्थानिक दबावामुळे सरकारने पुन्हा नवीन समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे.

पुढील दिशादरम्यान, केंद्र सरकारने या वादाकडे गांभीर्याने लक्ष देत संवादातून मार्ग काढावा, अशी मागणी दोन्ही राज्यांतील जनतेकडून होत आहे. पाणी, पूर आणि सागरी धोरणांच्या दृष्टीने हे प्रकरण केवळ तांत्रिक नसून पूरपट्ट्यातील नागरिकांचे भविष्य ठरवणार असल्याच्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

जलसंपदा विभागाने आतापर्यंत आम्हाला मदत केली नाही. आमचा सर्व अभ्यास पूर्ण झाला आहे. लवकरच सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. - सर्जेराव पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती 

रूरकी या संस्थेकडून अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तो अंतिम टप्प्यात आहे. कर्नाटक शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाशी दररोज संपर्क सुरू आहे. पाऊस जास्त झाला तर त्याची माहिती आम्ही देतो. त्यानुसार ते पाणी सोडण्याचे नियोजन करतात. अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. - चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर