शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

अलमट्टी उंचीवरुन महाराष्ट्र-कर्नाटकात संघर्ष, कर्नाटक सरकारचा गॅझेट अधिसूचनेसाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:59 IST

महाराष्ट्र सरकार कायदेशीर मार्गाने लढत नसल्याची अनेकांना खत

सुशांत घोरपडेम्हैसाळ : अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या भूमिकेला महाराष्ट्राने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या भूमिकेमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.कर्नाटक शासनातर्फे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केलं आहे की, धरण उंचीवाढीचा निर्णय हा २०१० मधील न्यायाधिकरणाच्या निर्णयावर आधारित असून तो आमचा हक्क आहे. यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांनी दिल्लीतील केंद्रीय जलशक्ती मंत्रालय तसेच प्रमुख नेत्यांना भेटून गॅझेट अधिसूचनेसाठी प्रयत्न सुरू केल्याचेही स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कोणताही निर्णय महाराष्ट्राच्या सहमतीशिवाय घेऊ नये. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दरवर्षी गंभीर पूरस्थिती निर्माण होते. याबाबत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार ही केला आहे. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी यांच्या सह अनेक संघटना या लढ्यासाठी एकत्र आल्या. आंदोलन केले मात्र शासन कायदेशीर मार्गाने लढत नसल्याची खंत अनेक संघटनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मांडत आहेत.

स्थानिक प्रतिनिधींचा विरोधया पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले आहेत. खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम आदींनी एकत्र येऊन केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, धरणाची उंची ५१५ मीटरपेक्षा अधिक वाढवू नये, अशी मागणी केली आहे. कोल्हापूर–सांगली मार्गांवर चक्काजाम आंदोलन करत नागरिकांनीही या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

तांत्रिक अहवालांमधील मतभेदमहाराष्ट्र सरकारने २०२० मध्ये नेमलेली नंदकुमार वाडनेरे समिती म्हणते की, अलमट्टी धरणामुळे पूरस्थिती निर्माण होत नसून, इतर भौगोलिक कारणे त्यामागे आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय आणि स्थानिक दबावामुळे सरकारने पुन्हा नवीन समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे.

पुढील दिशादरम्यान, केंद्र सरकारने या वादाकडे गांभीर्याने लक्ष देत संवादातून मार्ग काढावा, अशी मागणी दोन्ही राज्यांतील जनतेकडून होत आहे. पाणी, पूर आणि सागरी धोरणांच्या दृष्टीने हे प्रकरण केवळ तांत्रिक नसून पूरपट्ट्यातील नागरिकांचे भविष्य ठरवणार असल्याच्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

जलसंपदा विभागाने आतापर्यंत आम्हाला मदत केली नाही. आमचा सर्व अभ्यास पूर्ण झाला आहे. लवकरच सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. - सर्जेराव पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती 

रूरकी या संस्थेकडून अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तो अंतिम टप्प्यात आहे. कर्नाटक शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाशी दररोज संपर्क सुरू आहे. पाऊस जास्त झाला तर त्याची माहिती आम्ही देतो. त्यानुसार ते पाणी सोडण्याचे नियोजन करतात. अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. - चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर