शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

एकोणीस वर्षांत जुलै प्रथमच कोरडा, सांगली जिल्ह्यात केवळ १२ टक्के पाणीसाठा 

By अशोक डोंबाळे | Updated: July 14, 2023 11:53 IST

दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा, पाण्याची भीषण टंचाई

अशोक डोंबाळेसांगली : गेल्या एकोणीस वर्षांत जुलै महिना प्रथमच खडखडीत कोरडा जाताना दिसत आहे. सरासरी १३५.५० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ ६९.१ टक्के म्हणजे २१.१ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ८३ पाझर तलावांमध्येही १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यामध्ये पशुधनाच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यात गेल्या एकोणीस वर्षांत २००३ मध्ये जून, जुलैत सर्वात कमी पाऊस झाला होता. दुष्काळाच्या झळा बसल्या होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी ३३६ टँकर, चारा छावण्या आणि रोजगार हमी योजनेवर मजूर कामावर होते. त्यानंतर आतापर्यंत जून, जुलैत पावसाने हुलकावणी दिलेली नव्हती. पण या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. सर्वसाधारणपणे जुलैतच पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस पडतो.पण, जुलै निम्मा संपत आला तरीही केवळ २१.१ टक्के पाऊस पडल्यामुळे केवळ ९ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांमुळे जिल्ह्यातील पाझर तलावात १२ टक्के पाणीसाठा दिसत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दिसत नाही. पण, ती जाणवण्याची शक्यता आहे. कोयना धरणात १८ टक्के, तर वारणा धरणात २७ टक्के पाणीसाठा आहे.

सहा वर्षांतील पाऊस (मिलिमीटर)वर्ष - सरासरी - प्रत्यक्ष पाऊस२०१८ - १२२ - १२९.९२०१९ - १२२ - २१७.८२०२० - १३५.५० - ११७.८२०२१ - १३५.५० - ३२१.४२०२२ - १३५.५० - १९७.९०२०२३ - १३५.५० - ६९.१

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस