शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जयश्रीताईंना योग्य ती संधी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:50 IST

काँग्रेसकडून जयश्रीताईंचे खच्चीकरण

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातून मोठे नेते भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा होती. सांगली जिल्ह्यातील जे मोठे घराणे यायचे होते, ते आलेले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्रीताई पाटील यांना योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते.

माजी महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांचा प्रवेशमाजी महापौर किशोर शहा, किशोर जामदार, कांचनताई कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, अजित सूर्यवंशी, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, सुभाष यादव, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव, माजी सरपंच निवास पाटील, तानाजी पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब पाटील, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, शीतल लोंढे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षप्रवेशाचा हा चमत्कार भाजपचे नेते शेखर इनामदार व जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्यामुळे झाला.

दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून काँग्रेस नेते पक्ष सोडतातभाजपने विरोधी पक्षात असतानाही कधीही देशहित आणि समाजहिताचा विचार सोडला नाही, मात्र विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे नेतृत्व हे दिशाहीन आहे. नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याने आज अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

काँग्रेसकडून जयश्रीताईंचे खच्चीकरणफडणवीस यांनी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांचे स्मरण केले. वसंतदादांच्या समाजकार्याचा वारसा जयश्रीताई पुढे चालवत आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. मात्र, भाजप परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

भाजपमध्ये सन्मानजनक वागणूक मिळेल : जयश्रीताई पाटीलमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याच्या, सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. भाजपमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल, याची खात्री आहे, असेही जयश्रीताई पाटील यावेळी म्हणाल्या.