जयंत पाटील यांनी माळरानाचे नंदनवन केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST2021-06-19T04:19:19+5:302021-06-19T04:19:19+5:30
फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप ...

जयंत पाटील यांनी माळरानाचे नंदनवन केले
फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप वग्यानी, रघुनाथ जाधव, अर्जुन माने, गुरुनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील जमीन ओलिताखाली आणली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील माळरानाचे नंदनवन केले. महालक्ष्मी व पाचआंबा पाणीपुरवठा संस्थेमुळे आष्टा परिसरातील शेतकऱ्यांची शेती ‘सुजलाम सुफलाम झाली आहे', असे प्रतिपादन युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांनी केले.
आष्टा येथील पाचंअंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या नवीन ट्रान्सफार्मरचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होते. राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक माणिक शेळके, राजारामबापू दूध संघाचे संग्राम फडतरे, राजारामबापू पतसंस्थेचे रघुनाथ जाधव, नगरसेवक अर्जुन माने , दीपक मेथे, भीमराव मस्के, व्यवस्थापक गुरुनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
माणिक शेळके म्हणाले, संस्थेचे कार्यक्षेत्र १५०० एकर व १२६० एकर तारण क्षेत्र आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा विकास साधला आहे.