शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 15:19 IST

इस्लामपूर : राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ...

इस्लामपूर : राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ते चंद्र-तारेही देऊ म्हणतील, असा उपरोधात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मारला.इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या वाळवा तालुका असंघटित बांधकाम कामगार संघटनेने तालुक्यासह इस्लामपूर व आष्टा शहरातील २ हजार कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आले. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, सरपंच संजय पाटील, भगवान पाटील, सभापती संदीप पाटील, संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, शहराध्यक्ष निवास जाधव, आष्टा शहराध्यक्ष प्रकाश पवार, निवास गायकवाड उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने प्रतीक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना, आपण असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. कष्ट करणाऱ्या कुटुंबांना विविध लाभ देताना ऐन संकटात मदतीचा हात देता यावा, हा हेतू होता. सध्या हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असून बांधकाम आणि इतर क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कुटुंबांना स्थिरता व सुरक्षितता देण्याचे काम करीत आहे. हे पाहून समाधान वाटते. भविष्यात जे सहकार्य लागेल, ते देत राहू.सुभाषराव सूर्यवंशी म्हणाले, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटीत कष्टकरी भावा-बहिणींना संघटित करून त्यांना शासनाचे विविध लाभ मिळवून देत आहे. राज्यात प्रथम आम्ही मुलीच्या लग्नास ५१ हजार मंजूर करून घेतले. यावेळी शहाजी पाटील, संजय पाटील, पुष्पलता खरात, सागर चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनीता सौंदडे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली.यावेळी बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, खंडेराव जाधव, पुष्पलता खरात, माजी नगरसेवक रणजित मंत्री, कृष्णेचे संचालक संजय पाटील, दिग्विजय पाटील, अरुण कांबळे, शैलेश पाटील, हणमंत माळी, राजकुमार कांबळे, शंकरराव चव्हाण, अनिल पावणे, विलास भिंगार्डे, आयुब हवलदार, गुरुराज माने उपस्थित होते. संपर्क प्रमुख अविनाश गायकवाड यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती