शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

ओबीसींची सरकारकडून फसवणूक, जयंत पाटील यांनी केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:43 IST

कोल्हापूर खंडपीठ झाल्यास फायदा

सांगली : महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांचे दावणगिरी जिल्ह्यातील (कर्नाटक) शिमोग्यातील होदेगिरी येथे निधन झाले. तिथे त्यांचे साधे स्मारक आहे. त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उत्कृष्ट स्मारक उभे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी केली.अनुदान मागणीवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. ओबीसी महामंडळाला फक्त ५ कोटी देण्याचे पाप या सरकारने केले आहे. ओबीसींची घोर फसवणूक होत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले, विटा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होऊन वाहतूक सुरू झालेली आहे, पण विटा, खानापूर या शहरांना जोडणारे वळण रस्त्यांची (घाट) कामे रखडलेली आहेत. लोकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी लक्ष घालावे.

सांगलीच्या ड्रेनेज योजनेला २४ कोटी द्यासांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत २०११ मध्ये भुयारी गटारीचे काम मंजूर झाले. कार्यारंभ आदेश २०१३ ला दिला. कामाची मुदत फक्त दोन वर्षांची होती. आज १२ वर्षे झाली तरी काम पूर्ण नाही. काम विहित मुदतीत पूर्ण न झाल्यामुळे महापालिकेने ठराव केला. कंत्राटदारांना दंड केला. त्याचीही वसुली झालेली नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी अद्याप २४ कोटींची गरज आहे. तो निधी नगर विकास विभागाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

इस्लामपूरसाठी ७ कोटी निधी हवाइस्लामपूर नगरपालिकेतही भुयारी गटार योजना २०१७ मध्ये मंजूर झाली. अनेक कारणे देऊन मक्तदाराने ते काम २०२३ मध्ये बंद केले. सुधारित योजना नगरपालिकेने आता प्रस्तावित केली आहे, पण प्रशासकीय मंजुरीसाठी बराच वेळ जाणार आहे. भविष्यातील शहराचा विस्तार आणि भौगोलिक उतार लक्षात घेता सिवर पाइपलाइन नॅशनल हायवेच्या लगत घेणे आवश्यक आहे. नॅशनल हायवेला समांतर पाइपलाइन टाकल्याशिवाय पर्याय नाही. सध्या हायवेचे काम सुरू असताना सोबतच हे पाइपलाइनचे काम सुरू होणे गरजेचे आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. हे कार्य करण्यासाठी सुमारे ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी नगरविकास विभागाने उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली.

कोल्हापूर खंडपीठ झाल्यास फायदाजयंत पाटील म्हणाले, राज्यात ५५ लाख ६६ हजार ९२१ केसेस प्रलंबित आहेत. मुंबई उच्च न्यायालयात १८ लाख केसेस प्रलंबित आहेत. यासाठी सरकार कोणता दृष्टिकोन दाखवणार? कायदा आणि सुव्यवस्था विभागासाठी दिलेल्या बजेटच्या फक्त एक टक्का रक्कम खर्च झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे. कायदा व सुव्यवस्था राहूच नये, अशी सरकारची मानसिकता आहे का? कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे, यासाठी सातत्याने मागणी होत आहे. सरकारने पुढाकार घेऊन तसे केल्यास काही केसेस कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग करता येतील.

टॅग्स :SangliसांगलीVidhan Bhavanविधान भवनJayant Patilजयंत पाटीलOBCअन्य मागासवर्गीय जातीGovernmentसरकार