शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

‘जत’मध्ये टँकरलाही पाणी मिळेना

By admin | Updated: March 14, 2016 22:27 IST

पाणीसाठे संपुष्टात : प्रशासकीय यंत्रणा विवंचनेत; ७३ टँकरद्वारे पाणी पुरवठा

जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील गावांची संख्या ११६ आहे. त्यापैकी ५६ गावे आणि त्याखालील ४९४ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ३८ हजार ३२४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९० नागरिकांना माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा होत आहे.मार्च महिन्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. पाण्याचे टॅँकर व चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. सध्या ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअस इतके तापमान आहे. तुरळक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणीसाठे व पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पाणीसाठे संपुष्टात आल्यानंतर टॅँकर भरण्यासाठी पाणी कोठून आणायचे, या विवंचनेत प्रशासकीय यंत्रणा आहे. मार्च महिन्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. यानंतर एप्रिल व मे महिन्यात काय परिस्थिती निर्माण होणार?, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) साठवण तलावातून उमराणी, अमृतवाडी, बिळूर, बसर्गी, खोजानवाडी, व्हसपेठ (राजोबाचीवाडी), उंटवाडी, अचकनहळ्ळी या आठ गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बिरनाळ तलावात म्हैसाळ कालव्यातून आलेला पाणीसाठा आहे. या तलावातील पाणीसाठा समाधानकारक असला तरी येथून तालुक्याच्या पूर्व भागात साठ-सत्तर किलोमीटर लांब अंतरावर टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होणारे नाही. त्यामुळे तालुका प्रशासन पर्यायी उपाययोजना शोधत आहे.तालुक्यात ७४ टॅँकरसाठी प्रशासनाने १८०.७५ खेपा पाणी मंजूर केले असले, तरी प्रत्यक्षात १६७ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे. १३.७५ खेपाचे पाणी नागरिकांना मिळत नाही. प्रशासनाच्यावतीने माणसी वीस लिटर पाणी फक्त पिण्यासाठी मंजूर असले, तरी नादुरुस्त टॅँकर, वीज दाबनियमन, खराब रस्ते, पाणी उद्भव ठिकाण आदी कारणांमुळे सोळा किंवा सतरा लिटर पाणी मिळत आहे. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था अद्याप केलेली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे यांनी केली आहे. वायफळ (ता. जत) गावासाठी शासनाने २००८-२००९ या आर्थिक वर्षात भारत निर्माण योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. या कामासाठी ४६ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. ठेकेदाराने ४६ पैकी २५ लाख रुपये घेतले आहेत. त्यातून पाणीपुरवठा विहीर व पाईपलाईनचे काम केले आहे. पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण आहे. पाईपलाईनचे काम निकृष्ट झाले आहे. पाणी पुरवठा विहिरीत पाणी आहे. परंतु निकृष्ट काम व पाण्याची टाकी नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दीड लाखनागरिक टँकरच्या प्रतीक्षेत५६ गावे आणि त्याखालील ४९४ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ३८ हजार ३२४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९० नागरिकांना माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा होत आहे.चालूचे १४ कोटी शिल्लक : नवीन १६ कोटीच म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून बिरनाळ तलावात पाणी सोडून तालुक्याच्या पूर्व भागासाठी नियोजित नगाराटेक (जत) ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेला प्राधान्यक्रम देऊन निधी मंजूर केल्यास शासनाचा प्रत्येकवर्षी पाणी टंचाईवर होणारा खर्च वाचणार नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया जत येथील अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांनी दिली.