शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘जत’मध्ये टँकरलाही पाणी मिळेना

By admin | Updated: March 14, 2016 22:27 IST

पाणीसाठे संपुष्टात : प्रशासकीय यंत्रणा विवंचनेत; ७३ टँकरद्वारे पाणी पुरवठा

जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील गावांची संख्या ११६ आहे. त्यापैकी ५६ गावे आणि त्याखालील ४९४ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ३८ हजार ३२४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९० नागरिकांना माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा होत आहे.मार्च महिन्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. पाण्याचे टॅँकर व चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. सध्या ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअस इतके तापमान आहे. तुरळक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणीसाठे व पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पाणीसाठे संपुष्टात आल्यानंतर टॅँकर भरण्यासाठी पाणी कोठून आणायचे, या विवंचनेत प्रशासकीय यंत्रणा आहे. मार्च महिन्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. यानंतर एप्रिल व मे महिन्यात काय परिस्थिती निर्माण होणार?, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) साठवण तलावातून उमराणी, अमृतवाडी, बिळूर, बसर्गी, खोजानवाडी, व्हसपेठ (राजोबाचीवाडी), उंटवाडी, अचकनहळ्ळी या आठ गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बिरनाळ तलावात म्हैसाळ कालव्यातून आलेला पाणीसाठा आहे. या तलावातील पाणीसाठा समाधानकारक असला तरी येथून तालुक्याच्या पूर्व भागात साठ-सत्तर किलोमीटर लांब अंतरावर टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होणारे नाही. त्यामुळे तालुका प्रशासन पर्यायी उपाययोजना शोधत आहे.तालुक्यात ७४ टॅँकरसाठी प्रशासनाने १८०.७५ खेपा पाणी मंजूर केले असले, तरी प्रत्यक्षात १६७ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे. १३.७५ खेपाचे पाणी नागरिकांना मिळत नाही. प्रशासनाच्यावतीने माणसी वीस लिटर पाणी फक्त पिण्यासाठी मंजूर असले, तरी नादुरुस्त टॅँकर, वीज दाबनियमन, खराब रस्ते, पाणी उद्भव ठिकाण आदी कारणांमुळे सोळा किंवा सतरा लिटर पाणी मिळत आहे. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था अद्याप केलेली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे यांनी केली आहे. वायफळ (ता. जत) गावासाठी शासनाने २००८-२००९ या आर्थिक वर्षात भारत निर्माण योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. या कामासाठी ४६ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. ठेकेदाराने ४६ पैकी २५ लाख रुपये घेतले आहेत. त्यातून पाणीपुरवठा विहीर व पाईपलाईनचे काम केले आहे. पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण आहे. पाईपलाईनचे काम निकृष्ट झाले आहे. पाणी पुरवठा विहिरीत पाणी आहे. परंतु निकृष्ट काम व पाण्याची टाकी नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दीड लाखनागरिक टँकरच्या प्रतीक्षेत५६ गावे आणि त्याखालील ४९४ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ३८ हजार ३२४ इतकी आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९९० नागरिकांना माणसी वीस लिटरप्रमाणे पाणी पुरवठा होत आहे.चालूचे १४ कोटी शिल्लक : नवीन १६ कोटीच म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून बिरनाळ तलावात पाणी सोडून तालुक्याच्या पूर्व भागासाठी नियोजित नगाराटेक (जत) ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेला प्राधान्यक्रम देऊन निधी मंजूर केल्यास शासनाचा प्रत्येकवर्षी पाणी टंचाईवर होणारा खर्च वाचणार नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया जत येथील अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांनी दिली.