शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

'पूरग्रस्तांच्या व्यथा मांडणं, हे राजकारण नव्हे', पवारांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 09:00 IST

राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत.

ठळक मुद्देराज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत.पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल, पण त्यानंतर काय? पूरग्रस्तांच्या हाताला आता काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे.

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी, तेथील भीषण पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत गिरीश महाजनांवरही नाव न घेता टीका केली. लोकांना त्रास होतोय. हे सांगणं म्हणजे राजकारण नाही, अशा शब्दात फडणवीस यांच्या टीका केली. पूरग्रस्तांना चांगली घरे बांधून द्या, अशी मागणीही पवार यांनी केली.  

पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल, पण त्यानंतर काय? पूरग्रस्तांच्या हाताला आता काम देणं ही सरकारची जबाबदारी आहे. रोजगार हमी किंवा तत्सम योजनांवर लोकांना पाठवून त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. पूरग्रस्तांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारने मदत करण्याची गरज आहे. सांगलीतील पाणी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. तरच सांगलीतील पूरस्थिती आटोक्यात येऊ शकेल.

राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख हे सर्व ठीक चालले आहे, असं समजून चाललेले आहेत. काहीजण तर सेल्फी काढण्यासाठी जात असतील, तर ही स्थिती लवकर ठीक होईल, असं मला वाटत नाही, अशा शब्दात पवार यांनी महाजनांचं नाव न घेता टीका केली. त्यानंतर, मुख्यंमत्र्यांनाही सुनावले. मुख्यमंत्री म्हणत आहेत की, राजकारण करू नका. पण, हे काही राजकारण नाही. इथे लोकांना त्रास होतोय. लोकांना होणारा त्रास सांगणं म्हणजे राजकारण नाही. पूरग्रस्तांना दहा-पंधरा हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना चांगली घरे बांधून द्यावीत. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरनंतर शनिवारी सांगलीतील महापुराचा आढावा घेतला. फडणवीस यांनी हिराबाग येथील रेस्क्यू ऑपरेशनची पाहणी करून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पत्रकारांसमोर मांडली. तसेच, पूरस्थिती ओसरत असून आता पुनर्वसनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे महापूराच्या घटनेचं कुणीही राजकारण करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर, मला, हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी नसल्यामुळे मी उशिरा आलो. तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन आले होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगतिले. फडणवीस हे नदीच्या पुरानंतर तब्बल पाच दिवसांनी सांगलीत पोहोचले होते. 

टॅग्स :MumbaiमुंबईSangliसांगलीKolhapur Floodकोल्हापूर पूरSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस