शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

'पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले नाहीत, ही मोठी खंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:57 IST

दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले

विटा : दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले. पक्षानेही अनेक जणांना मोठी पदे दिली आहेत. परंतु, पक्षासह सर्वसामान्यांसाठी झटणारे पतंगराव कदममुख्यमंत्री झाले नाहीत, ही खंत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या प्रभारी खासदार रजनीताई यांनी व्यक्त केले.बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या १० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ मंगळवारी खा. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आ. मोहनराव कदम, संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, अध्यक्ष डॉ. राहुल कदम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी विभागप्रमुख कमलाकर पाटील, माजी कुलगुरू डी. पी. साबळे, पूर्ण वेळ संचालक उत्तम पाटील उपस्थित होते.खासदार पाटील म्हणाल्या, की दुष्काळी भागातील उदगिरी शुगर कारखाना अत्यंत चांगल्याप्रकारे सुरू आहे. भविष्यात तंत्रज्ञान आणि विज्ञानाची गाठ घालून कारखाने चालवावे लागतील.डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, की दुष्काळी खानापूर तालुक्यासह परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने उदगिरी कारखान्याची उभारणी केली आहे. एफआरपी हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. त्यामुळे एफआरपीचा एक पैसाही बुडविला नाही. हमीभावापेक्षा आतापर्यंत ६८ कोटी रुपये जादा दिले आहेत.अध्यक्ष डॉ. राहुल कदम म्हणाले की, पाणी व ऊस नसलेल्या भागात उदगिरी कारखान्याची उभारणी करून सुरुवातीला टँकरने पाणी आणून तीन हंगाम पूर्ण केले. आता तोच कारखाना प्रगतिपथावर असून खासगी साखर कारखान्यांच्या यादीत उदगिरी अव्वलस्थानी आहे.या कार्यक्रमास सुभाष पाटील, दादामहाराज नगरकर, गोविंद रूपनर, मालन मोहिते, रवींद्र देशमुख, नंदकुमार पाटील, रामरावदादा पाटील, जयहिंद साळुंखे, के. डी. जाधव उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPatangrao Kadamपतंगराव कदमChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेस