शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

जतमध्ये विघ्नहर्त्याच्या विसर्जनाचेच मोठे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:08 AM

गजानन पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यात पावसाने दडी दिल्याने ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या २२ गावांनी प्रशासनाकडे टॅँकरची मागणी केली आहे. पाण्याअभावी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. २८ पैकी ७ तलाव कोरडे असून, १४ तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेश मंडळांपुढे गणपतीचे विसर्जन कोठे करायचे, ...

गजानन पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यात पावसाने दडी दिल्याने ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या २२ गावांनी प्रशासनाकडे टॅँकरची मागणी केली आहे. पाण्याअभावी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. २८ पैकी ७ तलाव कोरडे असून, १४ तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेश मंडळांपुढे गणपतीचे विसर्जन कोठे करायचे, हा प्रश्न गावा-गावातून निर्माण झाला आहे.तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. वाड्या-वस्तीवर गणेश मंडळे आहेत. अनेक मंडळांनी मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यावर्षी मंडळांची नोंदणी आॅनलाईन करण्यात आली आहे. आॅनलाईन सेवेला इंटरनेट सुविधा व्यवस्थित मिळत नसल्यामुळे नोंदणीकृत मंडळांची संख्या कमी आहे. जत पोलीस ठाण्याकडे ३२ व उमदी पोलीस ठाण्याकडे ६८ मंडळांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात गणेश मंडळांची संख्या जास्त आहे. अनेक मंडळे नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत.नारळी पौर्णिमेनंतर तालुक्यात परतीच्या पावसाचा प्र्रवास सुरू होईल, असे वाटत होते. पण अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. विहिरी, ओढे, नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. नळ पाणी पुरवठा योजनांच्या विंधन विहिरी, परिसरातील पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याची पातळी ४०० ते ५०० फुटापर्यंत खाली गेली आहे. तालुक्यातील ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.ऐन पावसाळ्यातही अंकलगी, दरीबडची, कोंत्येवबोबलाद, व्हसपेठ, सोन्याळ, बागलवाडी, माडग्याळ, माणिकनाळ, तिकोंडी, हळ्ळी, कोणबगी, काराजनगी, सोनलगी, सोरडी, अंतराळ, आसंगी (जत), तिल्याळ, पांढरेवाडी, लमाणतांडा (दरीबडची), शिंगणापूर, सनमडी, वज्रवाड, बसरगी, टोणेवाडी, मिरवाड, बेळुंखी, बाज, कुडणूर, जिरग्याळ, लकडेवाडी या गावांनी टॅँकरची मागणी केली आहे. यामधील बागलवाडी, माडग्याळ, माणिकनाळ, तिकोंडी, शिंगणापूर व कोणबगी या सहा गावात प्रशासनाने टॅँकर सुरू न करता पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून दिले आहेत.आडात नाही : पोहऱ्यात कोठूनपावसाअभावी तलाव, कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गणेश मंडळांची संख्या अधिक आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आकाराने मोठ्या आहेत. त्यांचे विसर्जन करण्यासाठी जास्त खोलीच्या पाण्याची गरज आहे. जास्त पाणी नसल्याने मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मूर्ती व निर्माल्यामुळे पाणी दूषित होत असल्याने, विहिरीत गणेश विसर्जन करायला शेतकरी सहमती देत नाहीत.पाऊसही रुसला...तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ४५७.७ मि.मी. असून, आजअखेर १६४.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोरडी, सिद्धनाथ, तिकोंडी - १, तिकोंडी - २, पांडोझरी, बेळुंखी, खोजानवाडी अशा सात तलावातील पाणीसाठा संपला आहे. संख माध्यम प्रकल्प, दोेड्डनाला मध्यम प्रकल्प व दरीबडची, गुगवाड, मिरवाड, डफळापूर, बिळूर, केसराळ, उमराणी, भिवर्गी, शेगाव क्र. २ या तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे.