शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sangli Politics: गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर इस्लामपूरचे राजकारण पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:37 IST

सर्वपक्षीय नाराजीचा सूर

अशोक पाटीलइस्लामपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर संपूर्ण वाळवा तालुका आणि इस्लामपूर परिसरातील राजकारण पेटले आहे. सर्वपक्षीय नाराजीचा सूर उमटत असतानाच भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही पडळकरांच्या वक्तव्याबद्दल पक्षातील वरिष्ठांकडे तक्रारीचा सूर आळवला आहे.वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या नावाचा पडळकर यांनी गुरुवारी जतमध्ये एकेरी शब्दांत उल्लेख करीत जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पडळकर यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा वक्तव्याबाबत नाराजी दर्शविली. पडळकर यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेश नेतेसुद्धा संभ्रमात आहेत.

वाचा- तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही; बापू बिरूंच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना थेट इशाराइस्लामपूर मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे सध्या भाजपमध्ये आहेत. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना एकेकाळी ओळखले जात होते. ते सध्या भाजपमध्ये असून राज्यात धनगर समाजाचे नेतृत्व करीत आहेत. भाजपला चिमण डांगे यांच्यासारखे नेतृत्व इस्लामपूर मतदारसंघास मिळाले आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या समर्थकांतही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 

सर्वच नेत्यांनी एकमेकांचा आदर करावा. राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करणारे व्यक्तिमत्त्व समाजाचे आदर्श असतात. अलीकडील राजकारणात ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणणारे नेते निर्माण झाले आहेत. याची कारणे राजकारण्यांनी शोधावीत. महाराष्ट्राचे राजकारण विकासात्मक होते. राजकारणातील प्रस्थापित विस्थापितांचा आवाज दाबण्याचे काम करतात. त्यामुळेच राजकीय वातावरणात अशी परिस्थिती उद्भवत आहे. सर्वच नेत्यांनी आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा. - सदाभाऊ खोत, आमदार, भाजप पुरस्कृत­