शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

पुणदीची वाटचाल शंभर टक्के ठिबक सिंचनाकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:01 AM

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचनाने युक्त करण्याचे शिवधनुष्य तासगाव तालुक्यातील पुणदी गावाने उचलले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५ टक्के ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचनाने युक्त करण्याचे शिवधनुष्य तासगाव तालुक्यातील पुणदी गावाने उचलले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५ टक्के ठिबक सिंचन पूर्ण झाले आहे. संपूर्ण गावाने शेतीसाठी हा पर्याय स्वीकारल्याने दुष्काळमुक्तीचा आदर्श निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सिंचन योजना कार्यरत असल्या तरी, त्यांची वाढत चाललेली थकबाकी आणि पाण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ येते. स्वत:च्या मौल्यवान ऐवजाचे आपण जसे रक्षण करतो, तशी मानसिकता पाणी वापरताना कोणामध्ये आढळून येत नाही. मात्र, पुणदी गावाने पाण्याचे मोल जाणले आहे. येथे ज्यांची शेती ठिबकवर नाही, त्यांना पाणी व ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळणार नाहीत, असा ठरावच सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. आजवर या गावातील ८५ टक्के शेतकºयांनी ठिबक केले असून, येत्या काही दिवसात गाव १०० टक्के ठिबकयुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे.तासगाव तालुक्यातील पुणदी गावात तीन हजार एकर शेतीक्षेत्र आहे. गावात ५९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव आहे. तरीही गावात टंचाई निर्माण होत असे. तत्कालीन उपसरपंच व तासगाव बाजार समितीचे विद्यमान सभापती रवींद्र पाटील यांनी दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामसभेत, संपूर्ण गाव ठिबक सिंचनयुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. गावकºयांनी त्याला पाठिंबा दिला. जो ठिबक सिंचन करणार नाही, त्यास तलावातून पाणी न देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. ही मात्रा चांगलीच लागू पडली आणि अखेर संपूर्ण शिवार ठिबक सिंचनाकडे वळले. परिणामी पाण्याचा बेसुमार वापर टळला. आता गावात एकही पीक पाटाच्या पाण्यावर घेतले जात नाही. सध्याच्या कडक उन्हाळ्यातही गावात हिरवाई टिकून आहे. ताकारी योजनेतून तलाव भरण्यात येतो. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात जास्त पाणीसाठा पुणदी तलावात आहे.