शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sangli: रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांचा तपास पुन्हा सुरू, चौघांची नावे निष्पन्न; पोलिस पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:45 IST

नेपाळपर्यंत तपास

सांगली : शहरातील मार्केटयार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर टाकण्यात आलेल्या दराेडा प्रकरणातील संशयितांचा पुन्हा एकदा शोध सुरू करण्यात आला आहे. सांगलीपोलिसांनी बिहारमध्ये जाऊन तपास करत या प्रकरणातील चौघांची नावे निष्पन्न केली होती. मात्र, हे संशयित पोलिसांच्या हाती लागले नव्हते. आता पुन्हा एकदा याचा तपास सुरू करण्यात आला आहे.मिरज रोडवरील रिलायन्स ज्वेल्सवर रविवारी (दि. ४ जून) भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून सहा कोटी ४४ लाख रुपयांची दागिने लंपास करण्यात आली होती. दरोड्यावेळी १४ कोटींहून अधिकचे दागिने लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर ज्वेल्सच्या वतीने दिलेल्या फिर्यादीत साडेसहा कोटींची नोंद करण्यात आली होती.संपूर्ण राज्यात गाजलेल्या या प्रकरणाचा सांगली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न करण्यातही पोलिसांना यश आले होते.

चौघांची नावे निष्पन्न; आता शोध सुरूरिलायन्स ज्वेल्सवर अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून दरोडा टाकण्यात आला होता. पोलिसांसमोरही या प्रकरणाचे आव्हान होते. तरीही या प्रकरणाचा बिहार आणि नेपाळ सीमेपर्यंत जाऊन तपास करण्यात आला होता. यात गणेश भद्रावार (रा. हैदराबाद), प्रताप राणा (रा. वैशाली, बिहार), कार्तिक इनामदार (रा. हुगळी, बंगाल), प्रिन्सकुमार सिंह (रा. वैशाली, बिहार) यांची नावे निष्पन्न झाली होती.आता कसून शोधतपासात संशयितांची नावे निष्पन्न झाली असली तरी यातील कोणीही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. या टोळीकडून देशातील अनेक भागातही दरोडा टाकण्यात आल्याचेही समोर आल्याने त्यांना पकडण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. यामुळेच आता पुन्हा एकदा या संशयितांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

बिहारसह नेपाळपर्यंत तपासस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह ११हून अधिक पोलिसांची पथके या दरोड्याच्या तपासासाठी तयार होती. यानंतर एलसीबीच्या पथकाने बिहारमधील संशयितांचा भाग आणि अगदी नेपाळपर्यंत जाऊन माहिती घेतली. आताही पुन्हा एकदा हा तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस