शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

Sangli: निष्ठावंतावर अन्याय, बंडखोराला पायघड्यामुळे काँग्रेस संपण्याच्या मार्गावर; पक्षनिरीक्षकांसमोर कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:24 IST

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला. त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या ...

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला. त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठाकडे करणार का? , पक्षात वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे. त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही. महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील, पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही यावर काय उपाय करणार? काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला. त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची सोळा वर्षे वाया गेली याला जबाबदार कोण? बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करणार का? अशा प्रश्नांचा भडीमार मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या समोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो, निष्ठावंतावर अन्याय आणि बंडखोरांना पायघड्या ही कसली संस्कृती? सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असते, सांगली विधानसभा निवडणुकीत जो प्रकार स्वकियांनी केला त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांच्या मनात असंतोष धुमसत आहे. अय्याजभाई नायकवडी, आशिष कोरी, अनिल मोहिते, अ‍ॅड्. अमोल चिमाण्णा, राजेंद्र कांबळे, बिपीन कदम, डी. पी. बनसोडे, प्रकाश बरडोले, भारती भगत, सनी धोतरे यांनी तर काँग्रेसचे गटबाजी करणारे नेतेच काँग्रेस संपवत आहेत असे सांगून काँग्रेस पक्ष कोण संपवत आहेत याची जंत्रीच मांडली.

वरिष्ठांना अहवाल देणार: रामहरी रुपनवरपक्षीनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, महाराष्ट्रातील निवडक पराभवात पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवाचा समावेश होतो. आपल्याच लोकांनी आपला परभव करण हे फार चुकीचे आहे. अशाने काँग्रेस पक्ष पुढे जाणार नाही. काँग्रेसचा पराभव करणे म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष बैठकांचे सत्र आयोजित केले आहे. मरगळ झटकून कामाला लागा, येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. बूथ यंत्रणा सक्षम करु या. सकारात्मक प्रतिसाद दिला तर काँग्रेस सत्तेवर येईल. सांगलीत जे घडले त्याचे दुःख आम्हालाही आहे. वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला जाईल.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण