शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आरफळच्या पाण्याबाबतीत सांगली जिल्ह्यावर अन्याय, रोहित पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:43 IST

जलसंपदा मंत्र्यांकडून दखल

तासगाव : कण्हेर धरणातून आरफळ कालव्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पलूस, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांना पाणी मिळते. मात्र ३.८३ टीएमसी पाणी प्रस्तावित असताना केवळ दोन ते अडीच टीएमसी एवढेच पाणी आमच्या वाट्याला मिळते. आरफळच्या पाण्याबाबतीत सांगली जिल्ह्यावर अन्याय होतोय, अशी लक्षवेधी आमदार रोहित पाटील यांनी आज विधानसभेत मांडली. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.विधानसभेत लक्षवेधी मांडताना आमदार रोहित पाटील म्हणाले, आमच्या जिल्ह्याला पाणी देताना नेहमीच अन्याय होतो. याबाबतीत जलसंपदा विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सांगली जिल्ह्याला हक्काचे पाणी न मिळण्याची अनेक कारणे आहेत. काही तांत्रिक कारणेही आहेत. पलूस तालुक्यात भूसंपादनासाठी २०० कोटी रुपये व लाइनिंगसाठी ४० कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र शेतकऱ्यांना हे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांकडून कॅनॉल मुजवण्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे पाणी पुढे येत नाही.हक्काचे पाणी, जमिनीचा मोबदला द्या..२०१४ मध्ये पाण्याच्या आरक्षणाबाबत शासन निर्णय झाला आहे. मात्र, आजतागायत आमच्या जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळत नाही. याशिवाय भूसंपादन प्रक्रियेचे ३८५ हेक्टरचे निवाडे झाले आहेत. तर सुमारे ४०० हेक्टरचे निवाडे अद्याप झाले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना कराव्यात. शेतकऱ्यांना हक्काचे पाणी, त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीRohit Patilरोहित पाटिलVidhan Bhavanविधान भवन