शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

आरफळच्या पाण्याबाबतीत सांगली जिल्ह्यावर अन्याय, रोहित पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:43 IST

जलसंपदा मंत्र्यांकडून दखल

तासगाव : कण्हेर धरणातून आरफळ कालव्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पलूस, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांना पाणी मिळते. मात्र ३.८३ टीएमसी पाणी प्रस्तावित असताना केवळ दोन ते अडीच टीएमसी एवढेच पाणी आमच्या वाट्याला मिळते. आरफळच्या पाण्याबाबतीत सांगली जिल्ह्यावर अन्याय होतोय, अशी लक्षवेधी आमदार रोहित पाटील यांनी आज विधानसभेत मांडली. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.विधानसभेत लक्षवेधी मांडताना आमदार रोहित पाटील म्हणाले, आमच्या जिल्ह्याला पाणी देताना नेहमीच अन्याय होतो. याबाबतीत जलसंपदा विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सांगली जिल्ह्याला हक्काचे पाणी न मिळण्याची अनेक कारणे आहेत. काही तांत्रिक कारणेही आहेत. पलूस तालुक्यात भूसंपादनासाठी २०० कोटी रुपये व लाइनिंगसाठी ४० कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र शेतकऱ्यांना हे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांकडून कॅनॉल मुजवण्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे पाणी पुढे येत नाही.हक्काचे पाणी, जमिनीचा मोबदला द्या..२०१४ मध्ये पाण्याच्या आरक्षणाबाबत शासन निर्णय झाला आहे. मात्र, आजतागायत आमच्या जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळत नाही. याशिवाय भूसंपादन प्रक्रियेचे ३८५ हेक्टरचे निवाडे झाले आहेत. तर सुमारे ४०० हेक्टरचे निवाडे अद्याप झाले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना कराव्यात. शेतकऱ्यांना हक्काचे पाणी, त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीRohit Patilरोहित पाटिलVidhan Bhavanविधान भवन