शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अपघातातातील जखमी जवान शेखर कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू, सांगलीतील मसुचीवाडीत तीन दिवस दुखवटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:12 IST

एक महिन्याच्या सुटीवर ते गावी आले होते. मित्र प्रथमेश लोखंडे यांच्यासाेबत दुचाकीवरुन निघाले असता अज्ञात वाहनाने दिली हाेती धडक

बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अपघातात जखमी झालेले १७ मराठा बटालियनचे जवान शेखर बाळासाहेब कदम (वय २७) यांचे सोमवार, दि. २० राेजी ६ वाजता पुण्यातील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मसुचीवाडी येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शेखर कदम हे गुजरातमधील भूज येथे सैन्य दलात १७ मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. एक महिन्याच्या सुटीवर ते गावी आले होते. त्यांच्याच बटालियनमधील तांबवे (ता. वाळवा) येथील मित्र प्रथमेश लोखंडे यांच्यासाेबत वाघवाडीकडून इस्लामपूरकडे जाताना अज्ञात वाहनाने त्यांंना धडक दिली हाेती. अपघातात प्रथमेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला हाेता, तर शेखर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. साेमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच मसुचीवाडी व इस्लामपूर परिसरात शोककळा पसरली.मंगळवारी सायंकाळी मृतदेह मसुचीवाडी येथे आल्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, मंडळ अधिकारी संभाजी हंगे, सुभेदार नाईक शेखपीरा, जितेंद्र पाटील, माणिक शा. पाटील, धैर्यशील पाटील, सर्जेराव कदम, शांताराम कदम, माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.

गावात तीन दिवस दुखवटादोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना ८ महिन्यांचा मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी पितृछत्र हरपल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. लहान भाऊ श्रीधर हाही त्यांच्या प्रोत्साहनामुळे मागील वर्षी सैन्य दलात भरती झाला. शेखर यांच्या मृत्यूमुळे मसुचीवाडी गावाने उद्यापासून पुढील तीन दिवस दुखवटा पाळण्याचा, तसेच गुढीपाडवा साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू