शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अलमट्टी धरणातून त्वरित विसर्ग वाढवा, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 24, 2023 18:17 IST

सांगली : सांगली , कोल्हा पूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र ...

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने तशा सूचना कर्नाटकला द्याव्यात, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सध्या अलमट्टी धरणात एक लाख १४ हजार ४०० क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून केवळ ६७०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, असेही समितीने निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले की, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सांगलीत कृष्णा नदीत पाणी पातळी १७ फुटांवर गेली आहे. कोल्हापुरात पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. कृष्णा, वारणा नद्यांचीही तीच परिस्थिती असल्यामुळे आलमट्टी धरणातून किमान एक लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्याच्या सूचना कर्नाटकला द्याव्यात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सचिव स्तरावरील बैठक झाली नाही, ती तत्काळ घेण्याची गरज आहे. निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, विजयकुमार दिवाण, धनाजी चुडमुंगे आदींनी निवेदन पाठवले आहे.पूर रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करा : पाटीलपूर येऊच नये, यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करण्याची गरज आहे. सूचनांचे पालन न करता धरणातील पाणीसाठा केला जात आहे. पुन्हा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास नदीत विसर्ग वाढविला जाईल. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सर्जेराव पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रfloodपूर