शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापुरात ऊसदराचे गणित जमले, सांगलीत का बिघडले?; ऊस उत्पादकांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:36 IST

निर्णय न झाल्यास रविवारी चक्काजाम

समडोळी : यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये एफआरपीसह तुटलेल्या उसासाठी अपेक्षित रक्कम देण्याची निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य केला. मात्र सांगली जिल्ह्यात ऊसदराचे घोडे अडले. कोल्हापूरला जमले ते सांगली जिल्ह्यात का जमत नाही? असा संतप्त सवाल जिल्ह्यातील ऊस उत्पादकातून उपस्थित केला जात आहे.

यंदा हंगामात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे कृष्णा, वारणेच्या पाणी पातळीत घट झाली होती. हंगामानंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर पडणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच ऊसदर, हमीभाव, एफआरपी रक्कम, तुटलेल्या उसाचा हप्ता यासाठी स्वाभिमानीने ऊसतोड बंदची हाक दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संघटनेच्या मागणीनुसार प्रति टनास दर देण्याचे मान्य केले. ऊस उत्पादकांच्या खात्यावर तुटलेल्या उसाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू केली.सांगली जिल्ह्यात काही कारखान्यांचे अध्यक्ष, एम.डी. व शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. परंतु सर्वमान्य तोडगा निघाला नाही. सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची भूमिका कायम आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील एकही साखर कारखानदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबरपर्यंत योग्य तो निर्णय न झाल्यास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राजारामबापू कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे स्वाभिमानीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा तिढा कायम आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात जमते ते सांगली जिल्ह्याला का जमत नाही? असा आक्रमक पवित्रा घेत स्वाभिमानीने ८ डिसेंबर पर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. निर्णय न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग व अन्य ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला आहे.

जत व डफळापुर परिसरातील कारखान्याने गतवर्षी २४५० रुपये पहिली उचल दिली होती. दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल ३१०० रुपये देण्यास तयारी दर्शविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आजी- माजी मंत्र्यांनी देखील ३२०० ते ३२५० दर जाहीर केला आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदार का निर्णय घेत नाहीत. -संजय बेले, युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने