शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

sangli news: खटावमध्ये संक्रांतीला तिळगुळाबरोबर पोती भरुन वाटतात साखर, दीड-दोनशे वर्षांपासूनची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:07 IST

नवस फेडण्यासाठी ही पोत्या-पोत्याने साखरेचे वाटप

लिंगनूर : खटाव (ता. मिरज) येथील मकर संक्रांतीचा सण अवघ्या महाराष्ट्रात कदाचित सर्वाधिक गोड ठरला असावा. कारण यंदा सणानिमित्त गावकऱ्यांनी थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल १७० पोती साखर वाटून तोंड गोड केले.गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून खटावमध्ये संक्रांतीनिमित्त साखर वाटपाची अनोखी परंपरा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रातीला हा अनोखा सोहळा साजरा होतो. काळ बदलला, तरी खटावकरांनी परंपरेचा विसर पडू दिला नाही. संक्रांतीला गावोगावी तिळगूळ वाटप होते, खटावचे ग्रामस्थ मात्र पोती भरभरुन साखर वाटतात. त्यात तीळगूळ ही मिसळतात.

ग्रामदैवत सोमेश्वर व अमोघसिद्ध देवांच्या पालखीसमोर वाटप होते. घरटी किमान दोन किलो साखर हमखास वाटली जाते, शिवाय नवस फेडण्यासाठी ही पोत्या-पोत्याने साखरेचे वाटप भाविक करतात. त्यामुळे संक्रांतीच्या अगोदर काही दिवस गावातील व्यापारी तीळगूळ ऐवजी साखरेचाच घाऊक साठा करुन ठेवतात.संक्रांतीला देवांची पालखी जवळच्याच ऐनापूर (ता. अथणी) गावात सिद्धेश्वराच्या भेटीला नेली जाते. तेथे कृष्णा नदीत स्नान घालून सकाळी गावात आणतात. गावाजवळ येईल, तशी पालखी पळवतात. फटाक्यांच्या आतषबाजीत व धनगरी ढोलांच्या निनादात गावकरी स्वागत करतात.किंक्रांतीला दिवसभर पालखी गावाबाहेर सोमेश्वर मंदिरात थांबते. सायंकाळी आंबील, भाताचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी गावातील मंदिराच्या मैदानात येते. तेथे गावकरी पहिली साखर देवाला देतात. भक्तांच्या साखरेने पालखी भरुन जाते. त्यानंतर गावभर साखर वाटपाचा सोहळा सुरु होता.ग्रामस्थांकडे साखरेच्या पिशव्याच पिशव्यामुठी-मुठीने आणि पाटीपाटीने एकमेकांना साखर वाटली जाते. परस्परांना भरविली जाते. कन्नड आणि मराठीत शुभेच्छा दिल्या जातात. रात्री अकरापर्यंत हा अनोखा साेहळा चालतो. ग्रामस्थांचे खिसे साखरेने ओथंबून जातात. साखरेने भरलेल्या पिशव्या घेऊन घराकडे परतणारे गावकरी रस्तोरस्ती दिसतात. यावर्षी सोमवारी (दि. १६) रात्री अवघ्या चार तासांत ५० किलोंच्या १७० पोती साखरेचे वाटप ग्रामस्थांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीMakar Sankrantiमकर संक्रांती