शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

‘शक्तिपीठ’बाबत सुनावणी नाही तर शेतात पाय ठेवू देणार नाही; बाधित शेतकऱ्यांचा इशारा 

By अशोक डोंबाळे | Updated: April 7, 2025 13:52 IST

हरकती घेऊन वर्ष संपले तरीही सुनावणी नाही

सांगली : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी हजारो हरकती घेऊन महामार्ग नको, अशी मागणी मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. पण, या हरकतीवर सुनावणी घेण्यापूर्वीच राज्य सरकारने महामार्गाच्या जागेची मोजणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शक्तिपीठ महामार्गाची सुनावणी नाही तर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे.दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची ७ मार्च २०२४ रोजी दुसरी अधिसूचना जाहीर करून त्यामध्ये १२ जिल्ह्यातील २७ प्रांताधिकारी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून तर संबंधित विभागीय आयुक्तांची लवाद म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याच अधिसूचनेत १२ जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचे गट नंबर व बाधित क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे. तसेच ज्या बाधित शेतकऱ्यांच्या हरकती व आक्षेप असेल त्यांनी ७ मार्च २०२४ पासून २१ दिवसात लेखी स्वरूपात भूसंपादन अधिकारी यांच्याकडे देण्याचे नमूद केले होते.त्यानुसार बाधित १२ जिल्ह्यातील सर्व शेतकरी तसेच सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी हजारो हरकती दिलेल्या आहेत. त्याला संपूर्ण एक वर्ष उलटून गेले तरी ही एका शेतकऱ्याच्या हरकतीवर सुनावणी घेतली नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शासनाने तातडीने हरकतीवर सुनावणी घ्यावी. शासन कायद्याची पायमल्ली करीत आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय कोणत्याही प्रकारची भूसंपादन प्रक्रिया वावरात राबवू नये. शेतकऱ्यांचा आवाज हुकूमशाही पद्धतीने दाबण्याचा घाट शासनाने आखला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, शिवाजी शिंदे, रमेश कांबळे, ज्येष्ठ नेते गजानन पाटील, गजानन सावंत, हणमंत सावंत, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

रस्त्यावरची लढाई तीव्र करणार : दिगंबर कांबळेशासन दरबारी वारंवार निवेदने देऊनही शासनाला शेतकऱ्यांचा टाहो ऐकू येत नसेल तर आता आम्ही वावरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा वावरात रोवून तुमची वाटच पाहतोय. कुणाचीही मागणी नसलेला हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त, भूमिहीन, करणारा शक्तिपीठ महामार्ग कसा होतो तेच आम्ही पाहणार आहे. यापुढे रस्त्यावरची लढाई तीव्र करणार आहे, असा इशाराही दिगंबर कांबळे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गCourtन्यायालयFarmerशेतकरीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग