शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्तिपीठ’बाबत सुनावणी नाही तर शेतात पाय ठेवू देणार नाही; बाधित शेतकऱ्यांचा इशारा 

By अशोक डोंबाळे | Updated: April 7, 2025 13:52 IST

हरकती घेऊन वर्ष संपले तरीही सुनावणी नाही

सांगली : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी हजारो हरकती घेऊन महामार्ग नको, अशी मागणी मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. पण, या हरकतीवर सुनावणी घेण्यापूर्वीच राज्य सरकारने महामार्गाच्या जागेची मोजणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शक्तिपीठ महामार्गाची सुनावणी नाही तर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे.दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची ७ मार्च २०२४ रोजी दुसरी अधिसूचना जाहीर करून त्यामध्ये १२ जिल्ह्यातील २७ प्रांताधिकारी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून तर संबंधित विभागीय आयुक्तांची लवाद म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याच अधिसूचनेत १२ जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचे गट नंबर व बाधित क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे. तसेच ज्या बाधित शेतकऱ्यांच्या हरकती व आक्षेप असेल त्यांनी ७ मार्च २०२४ पासून २१ दिवसात लेखी स्वरूपात भूसंपादन अधिकारी यांच्याकडे देण्याचे नमूद केले होते.त्यानुसार बाधित १२ जिल्ह्यातील सर्व शेतकरी तसेच सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी हजारो हरकती दिलेल्या आहेत. त्याला संपूर्ण एक वर्ष उलटून गेले तरी ही एका शेतकऱ्याच्या हरकतीवर सुनावणी घेतली नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शासनाने तातडीने हरकतीवर सुनावणी घ्यावी. शासन कायद्याची पायमल्ली करीत आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय कोणत्याही प्रकारची भूसंपादन प्रक्रिया वावरात राबवू नये. शेतकऱ्यांचा आवाज हुकूमशाही पद्धतीने दाबण्याचा घाट शासनाने आखला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, शिवाजी शिंदे, रमेश कांबळे, ज्येष्ठ नेते गजानन पाटील, गजानन सावंत, हणमंत सावंत, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

रस्त्यावरची लढाई तीव्र करणार : दिगंबर कांबळेशासन दरबारी वारंवार निवेदने देऊनही शासनाला शेतकऱ्यांचा टाहो ऐकू येत नसेल तर आता आम्ही वावरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा वावरात रोवून तुमची वाटच पाहतोय. कुणाचीही मागणी नसलेला हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त, भूमिहीन, करणारा शक्तिपीठ महामार्ग कसा होतो तेच आम्ही पाहणार आहे. यापुढे रस्त्यावरची लढाई तीव्र करणार आहे, असा इशाराही दिगंबर कांबळे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गCourtन्यायालयFarmerशेतकरीShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग