शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

समान नागरी कायदा:..तर त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील, माजी मंत्र्यांने व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:23 IST

परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

इस्लामपूर : भारतीय जनता पार्टीने देशात समान नागरी कायदा आणला तर तो भाजपलाच अहिताचा होईल. हा कायदा आणला गेला तर भाजपला पुन्हा सत्तेवर यायला किती वर्षे घालवावी लागतील याचा सुज्ञांनी विचार करावा, असे मत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डांगे यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात भाजपचा कार्यकर्ता म्हणून बोलणाऱ्या गृहस्थांनी केलेल्या ‘भारतीय जनता पार्टीने समान नागरी कायदा आणावा, तो त्यांना फायद्याचा ठरेल’ अशा वक्तव्याचा हवाला दिला आहे.

डांगे यांनी म्हटले आहे की, घटनाकारांनी ज्या कारणामुळे समाजातील अनुसूचित जाती-जमाती व मागासांच्या विशेष प्रवर्गासाठी आरक्षण निर्माण केले, त्याचे मुख्य कारण आज ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो त्या जातीजमातींचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना आरक्षण दिले होते. आरक्षणाचा फायदा घेऊन ५-१० टक्के लोकांचेच जीवनमान कदाचित सुधारले आहे, असे म्हणता येईल. परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

ही वस्तुस्थिती नजरेआड करून भाजपने समान नागरी कायदा करून मागास समाजाला आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित ठेवले, तर त्याचे उलट पडसाद उमटून आरक्षणाचे कवच असलेला हा मागासलेला समाज भाजपच्या विरोधात जाऊन त्याचे दुष्परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील. पक्षाची पुुन्हा सत्तेवर येण्याची संधी गमवावी लागेल, हे उघड सत्य दृष्टीआड करून चालणार नाही.

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागतोय, त्यांना तुम्हास आरक्षण मिळणार नाही, अथवा त्यापुढे जाऊन मराठा समाज प्रगत आहे. त्यास आम्ही आरक्षण देणार नाही, असे भाजपचा कोणी नेता अथवा राज्यकर्ते म्हणू शकत नाहीत. उलट मराठा समाजाला तात्पुरते का होईना बरे वाटण्यासाठी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी भाजपचे राज्यकर्ते सकारात्मकपणाचा उसना आव आणत आहेत, असेही प्रसिद्धीपत्रकात डांगे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा