शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायदा:..तर त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील, माजी मंत्र्यांने व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:23 IST

परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

इस्लामपूर : भारतीय जनता पार्टीने देशात समान नागरी कायदा आणला तर तो भाजपलाच अहिताचा होईल. हा कायदा आणला गेला तर भाजपला पुन्हा सत्तेवर यायला किती वर्षे घालवावी लागतील याचा सुज्ञांनी विचार करावा, असे मत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डांगे यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात भाजपचा कार्यकर्ता म्हणून बोलणाऱ्या गृहस्थांनी केलेल्या ‘भारतीय जनता पार्टीने समान नागरी कायदा आणावा, तो त्यांना फायद्याचा ठरेल’ अशा वक्तव्याचा हवाला दिला आहे.

डांगे यांनी म्हटले आहे की, घटनाकारांनी ज्या कारणामुळे समाजातील अनुसूचित जाती-जमाती व मागासांच्या विशेष प्रवर्गासाठी आरक्षण निर्माण केले, त्याचे मुख्य कारण आज ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो त्या जातीजमातींचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना आरक्षण दिले होते. आरक्षणाचा फायदा घेऊन ५-१० टक्के लोकांचेच जीवनमान कदाचित सुधारले आहे, असे म्हणता येईल. परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

ही वस्तुस्थिती नजरेआड करून भाजपने समान नागरी कायदा करून मागास समाजाला आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित ठेवले, तर त्याचे उलट पडसाद उमटून आरक्षणाचे कवच असलेला हा मागासलेला समाज भाजपच्या विरोधात जाऊन त्याचे दुष्परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील. पक्षाची पुुन्हा सत्तेवर येण्याची संधी गमवावी लागेल, हे उघड सत्य दृष्टीआड करून चालणार नाही.

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागतोय, त्यांना तुम्हास आरक्षण मिळणार नाही, अथवा त्यापुढे जाऊन मराठा समाज प्रगत आहे. त्यास आम्ही आरक्षण देणार नाही, असे भाजपचा कोणी नेता अथवा राज्यकर्ते म्हणू शकत नाहीत. उलट मराठा समाजाला तात्पुरते का होईना बरे वाटण्यासाठी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी भाजपचे राज्यकर्ते सकारात्मकपणाचा उसना आव आणत आहेत, असेही प्रसिद्धीपत्रकात डांगे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा