शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

समान नागरी कायदा:..तर त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील, माजी मंत्र्यांने व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:23 IST

परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

इस्लामपूर : भारतीय जनता पार्टीने देशात समान नागरी कायदा आणला तर तो भाजपलाच अहिताचा होईल. हा कायदा आणला गेला तर भाजपला पुन्हा सत्तेवर यायला किती वर्षे घालवावी लागतील याचा सुज्ञांनी विचार करावा, असे मत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डांगे यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात भाजपचा कार्यकर्ता म्हणून बोलणाऱ्या गृहस्थांनी केलेल्या ‘भारतीय जनता पार्टीने समान नागरी कायदा आणावा, तो त्यांना फायद्याचा ठरेल’ अशा वक्तव्याचा हवाला दिला आहे.

डांगे यांनी म्हटले आहे की, घटनाकारांनी ज्या कारणामुळे समाजातील अनुसूचित जाती-जमाती व मागासांच्या विशेष प्रवर्गासाठी आरक्षण निर्माण केले, त्याचे मुख्य कारण आज ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो त्या जातीजमातींचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना आरक्षण दिले होते. आरक्षणाचा फायदा घेऊन ५-१० टक्के लोकांचेच जीवनमान कदाचित सुधारले आहे, असे म्हणता येईल. परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.

ही वस्तुस्थिती नजरेआड करून भाजपने समान नागरी कायदा करून मागास समाजाला आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित ठेवले, तर त्याचे उलट पडसाद उमटून आरक्षणाचे कवच असलेला हा मागासलेला समाज भाजपच्या विरोधात जाऊन त्याचे दुष्परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील. पक्षाची पुुन्हा सत्तेवर येण्याची संधी गमवावी लागेल, हे उघड सत्य दृष्टीआड करून चालणार नाही.

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागतोय, त्यांना तुम्हास आरक्षण मिळणार नाही, अथवा त्यापुढे जाऊन मराठा समाज प्रगत आहे. त्यास आम्ही आरक्षण देणार नाही, असे भाजपचा कोणी नेता अथवा राज्यकर्ते म्हणू शकत नाहीत. उलट मराठा समाजाला तात्पुरते का होईना बरे वाटण्यासाठी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी भाजपचे राज्यकर्ते सकारात्मकपणाचा उसना आव आणत आहेत, असेही प्रसिद्धीपत्रकात डांगे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा