शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दराची कोंडी न फोडल्यास रविवारी महामार्ग रोखणारच; स्वाभीमानीचा इशारा

By अशोक डोंबाळे | Published: December 07, 2023 2:53 PM

‘स्वाभिमानी’चा जिल्हा प्रशासनासह कारखानदारांना इशारा

अशोक डोंबाळे/सांगली

सांगली : इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी दि. ८ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आश्वासन दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शब्द पाळवा, अन्यथा दि. १० डिसेंबरला पेठ (ता. वाळवा) येथे पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली आहे.

संदीप राजोबा म्हणाले, राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथे १ डिसेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. मागील गळीत हंगामाला गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला असेल तर त्यांनी प्रतिटन ५० रुपये द्यावेत. तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखानदारांनी प्रतिटन १०० रुपये द्यावेत. तसेच यावर्षीच्या गळीत हंगामासाठी एकरकमी तीन हजार १०० रुपये दर दिला पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले होते. शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीमध्ये जीवावर उदार होऊन उड्या घेतल्या होत्या. सांगलीचे जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन हे जिल्हाधिकारी यांचा निरोप घेऊन आले होते. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची दि. ८ डिसेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात येणार आहे. आश्वासनाची जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती अजून कोणतीही हालचाल दिसत नाही. प्रशासनाला दिलेली मुदत शुक्रवारी संपत आहे. जिल्हा प्रशासनाने ऊस दराची कोंडी फोडली नाही तर रविवार, दि. १० रोजी पेठ येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालूच असणार आहे, असेही राजोबा म्हणाले.

जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे लक्षजिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार दर देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवार, दि. ८ रोजी बैठक साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी कोणता तोडगा काढणार आहेत, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना