शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मी फक्त हिंदू मतांवरच निवडून आलो : मंत्री नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:00 IST

विशाळगडावर उरूस होऊ देणार नाही

सांगली : भारतात सर्वात जास्त हिंदू राहात असल्याने भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही. मी फक्त हिंदू मतांवरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे. ज्या हिंदूंनी आम्हाला निवडून दिले आहे त्यांची सुरक्षितता हे आमचे कर्तव्यच आहे, असे विधान मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.सांगलीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीताताई केळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.नितेश राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये सुरुवातीला धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी हा शब्द पुढे आणला. ज्यांना सर्वधर्मसमभाव याची टेप लावायची असेल, त्यांनी पाकिस्तानात जाऊन लावावी, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.

विशाळगडावर उरूस होऊ देणार नाहीनितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्हालाही विशाळगडावर १२ तारखेला उरूस कसा भरतो, ते बघायचंय, असं म्हणत १२ जानेवारीला विशाळगडावर आयोजित केलेल्या उरुसाला नितेश राणे यांनी विरोध केला आहे.

मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चारवेळा आमदार : सुरेश खाडेमाजी मंत्री सुरेश खाडे म्हणाले, आम्ही दलित असलो तरी हिंदू आहोत. हिंदू राष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाहीत. हिंदू राष्ट्र झाले तर अजिबात चिंता नाही. हिंदू राष्ट्रनिर्मितीकडे केंद्र सरकारची पावले पडत आहेत, त्याला आपलीही साथ हवी. हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे, अशी आपलीही मागणी आहे. तसेच मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चारवेळा निवडून आलो आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीNitesh Raneनीतेश राणे HinduहिंदूMuslimमुस्लीम