शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पतंगरावांमुळेच मी ‘अनाथांची माय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:13 PM

कडेगाव : आमदार डॉ. पतंगराव कदम गरीब घरात जन्माला आले नसते, तर ते गोरगरिबांचे कैवारी झाले नसते. त्यांनी माझी ...

कडेगाव : आमदार डॉ. पतंगराव कदम गरीब घरात जन्माला आले नसते, तर ते गोरगरिबांचे कैवारी झाले नसते. त्यांनी माझी मुलगी तसेच माझी अनाथ मुले भारती विद्यापीठात सांभाळली व शिकवली. त्यामुळे सिंधुताई ‘अनाथांची माय’ झाली आणि जगाला कळली. मी अनाथांसाठी जे कार्य उभे केले आहे, त्यास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. भारती विद्यापीठ व जनता हेच माझे सरकार आहे. त्यामुळे मला अनुदानाची गरजही भासली नाही, असे प्रतिपादन सिंधुताई सपकाळ यांनी केले.चिंचणी (ता. कडेगाव) येथे बाळकृष्ण पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील फौंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यानात सिंधुताई सपकाळ बोलत होत्या. यावेळी आ. मोहनराव कदम उपस्थित होते.सिंधुताई म्हणाल्या, संकटात खरी ऊर्जा सामावलेली असते. त्यामुळे संकटांना वेलकम म्हणा. संकटांना बळी न पडता आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करा. आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिम्मत होता कामा नये, इतके महिलांनी व मुलींनी सक्षम व्हायला हवे. विज्ञान युगात वावरत असलो तरी, संस्कृती जपली पाहिजे.वसंतराव माने यांनी प्रास्ताविक केले. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जि. प. सदस्या वैशाली कदम, सरपंच मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, प्रल्हाद पाटील, डॉ. गौरी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत बुरंग यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल पाटील यांनी आभार मानले....आणि सिंधुताई गहिवरल्यामाझा जीवनातील पहिला सत्कार आ. मोहनराव कदम यांनी सांगलीत केला. ज्या गावातून पतीने व नातेवाईकांनी मला दगड मारून हाकलून दिले, त्या माझ्या सासरच्या गावात पतंगरावांनी सत्कार केल्याची आठवण सिंधुतार्इंनी सांगितली. पतंगरावांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे सांगताना सिंधुताई यांना अश्रू अनावर झाले.