सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसभरात ४०५ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, पाचजणांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, २२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णांची संख्या गुरुवारी नोंदली गेली आहे. त्यासह सांगली, मिरज शहरांसह तासगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढत असून सांगलीत शंभरपेक्षा जादा रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआरअंतर्गत १३८५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २०८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच रॅपिड ॲन्टिजेनच्या १५३७ जणांच्या तपासणीतून २१३ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेत असलेल्या ३२४१ रुग्णांपैकी ३९४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३६० जण ऑक्सिजनवर, तर ३४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यासह सोलापूरचे २, कोल्हापूरचे ३, ठाणेतील २, मुंबईचे ४, पुणेचा १ आणि औरंगाबाद येथील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५४२९३
उपचार घेत असलेले ३२४१
कोरोनामुक्त झालेले ४९२२०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८३२
गुरुवारी दिवसभरात...
सांगली ११०
मिरज ३६
वाळवा ५२
मिरज तालुका ४२
खानापूर, तासगाव प्रत्येकी २४
आटपाडी, जत, कडेगाव प्रत्येकी २३
पलूस २१
शिराळा २०
कवठेमहांकाळ ७