शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपुरात मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारातील भाजीपाला गेला वाहून, विक्रेत्यांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:34 IST

पालिका प्रशासनाच्या बाजार हलविण्याच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

इस्लामपूर : इस्लामपूर शहरात रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जयहिंद व अंबिका देवालय परिसरात भरणारा भाजीपाल्याचा आठवडा बाजार गटारीतील पाणी तुंबून रस्त्यावर आल्याने त्यात वाहून गेला. या पाण्याच्या लोटातून टोमॅटो, दोडका, भेंडी, वांगी वाहून गेली.तर भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. पालिका प्रशासनाच्या बाजार हलविण्याच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.शहरातील मुख्य भाजी मार्केटच्या इमारतीचे काम सुरू झाल्याने गेल्या महिनाभरापासून गुरुवार आणि रविवारचा आठवडा बाजार जयहिंद चित्रमंदिर, अंबिका आणि संभूआप्पा-बुवाफन देवालय परिसरातील रस्त्यावर भरवण्यास सुरुवात झाली; मात्र रविवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी आणि भाजीपाला व्यापाऱ्यांची मोठी दैना उडवली.हा परिसर उताराच्या बाजूला असल्याने आझाद चौक, डांगे चौक, तहसील कचेरी चौक अशा सर्व बाजूंनी जाणारे पाणी जयहिंद चित्र मंदिरापासून खाली वाहत असते. आज आठवडा बाजाराची मांडणी करण्यात शेतकरी आणि व्यापारी फळ विक्रेते, धान्य विक्रेते, मेवा विक्रेते व्यस्त होते. त्याच वेळी या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यासह गटारी तुंबून त्यातील पाणीही रस्त्यावरून वाहू लागल्याने भाजीपाला व फळ भाज्या या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

या परिस्थितीनंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता. रागाच्या भरात या सर्वांनी पुन्हा आपला माल उचलून तहसील कार्यालय परिसरातील मूळच्या जागी ठाण मांडले. पालिका प्रशासनाकडेही या समस्येवर कोणतेच उत्तर नव्हते.