शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतीला १५० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:31 IST

प्रशासनाकडून शासनाला अहवाल पाठविला : दोन दिवसात शेतकऱ्यांना होणार मदतीचे वाटप

सांगली : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि कृष्णा, वारणा नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे सुमारे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला असून, आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ९५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत आणि खानापूर या तालुक्यातील ९५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपले. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. सुरुवातीला शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने तालुक्यांमध्ये बाधित शेतीचे पंचनामे करून सुमारे ५० हजार हेक्टरपर्यंत शेती बाधित झाल्याचा अहवाल पाठवला होता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील उर्वरित खरीप पिके पाण्याखाली बुडाली. उभी पिके कुजली तर काडणी आणि मळणी झालेले धान्य भिजून खराब झाले. द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला. शेतकरीवर्गामध्ये सरसकट पंचनामे करण्याची मागणी सुरू झाली.पूर्वी शासनाने जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी आठ तालुक्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची माहिती दिली होती. फेर सर्वेक्षणानुसार पलूस आणि कडेगाव तालुक्यांनाही बाधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार सुमारे ९५ हजार हेक्टरवरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. दिवाळीच्या अगोदर भरपाईची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.दरम्यान, प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात पहिल्या टप्प्यातील भरपाईचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. निधी मिळताच शासनाच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास सुरुवात होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार जमाशासनाच्या आदेशानुसार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडे सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून निधी मंजूर असून, लवकरच तो मिळणार आहे. येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Cause ₹150 Crore Loss to Sangli Farms

Web Summary : Sangli agriculture suffers ₹150 crore loss due to excessive rains and floods damaging 95,000 hectares of crops. Farmers await compensation as the administration submits loss reports, with funds expected soon.