शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सांगलीकरांचे आजार वाढण्यामागे यंत्रणांचे षडयंत्र?, पैसे घेऊन महापालिकेचा आरोग्याशी खेळ

By अविनाश कोळी | Updated: June 17, 2024 16:29 IST

दिवसेंदिवस सांगलीकरांचे शरीर कमजोर होत आहे. कुणी कोरोनाला, तर कुणी पोटात जाणाऱ्या अन्नाचे कारण देत आहे. प्रत्यक्षात या दोन्ही ...

दिवसेंदिवस सांगलीकरांचे शरीर कमजोर होत आहे. कुणी कोरोनाला, तर कुणी पोटात जाणाऱ्या अन्नाचे कारण देत आहे. प्रत्यक्षात या दोन्ही घटकांपेक्षाही मोठा शारीरिक आघात पाण्याच्या माध्यमातून केला जात आहे. अनेक शासकीय यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या पोटात विष कालविण्याचा उद्योग अनेक वर्षांपासून सुरू आहे. तोही जनतेचेच पैसे घेऊन जी नागरिकांची अवस्था, तीच जलचर प्राण्यांचीही झाली आहे. नदीतील माशांपासून नदीकाठच्या शेतीपर्यंत साऱ्यांनाच या प्रदूषणाचा विळखा पडला आहे. या षडयंत्राचा पर्दाफाश करणारी मालिका वाचा आजपासून..अविनाश कोळीसांगली : एक नव्हे, अनेक आजारांनी सांगलीकर त्रस्त आहेत. त्यांचे शरीर आजारांचे आगार होऊ पाहात आहे. कर भरून जे पाणी महापालिका जनतेला पाजत आहे, त्या पाण्यातून आरोग्याशी खेळ खेळला जात असताना कोणीही त्यावर आवाज उठविण्यास तयार नाही. २०१६ मध्ये काही अभ्यासकांनी शेरी नाल्याचा अभ्यास करताना गंभीर निरीक्षणे मांडली होती. हा अभ्यास होऊन आता आठ वर्षे उलटल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. वेळीच या गोष्टी थांबल्या नाहीत तर आजारी माणसांचे शहर म्हणून सांगलीची ओळख निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

देशातील चौथी मोठी नदी असलेली कृष्णा सांगलीला लाभल्यानंतर समृद्धीचे दान तिने दिले. रिटर्न गिफ्ट म्हणून आधुनिक सांगलीकरांनी या नदीला शेरी नाल्याची भेट दिली. सांगलीचा मोठा भाग, माधवनगर, बुधगाव, कुपवाड, पद्माळे अशा गावांमधील सांडपाणी सांगलीतील पात्रात शेरी नाल्याच्या माध्यमातून मिसळते. हा शेरी नाला दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे.

अभ्यास अहवाल कुणी केला?डॉ. अजित यादव यांनी २०१६ मध्ये शिवाजी विद्यापीठास ‘शेरी नाल्याचा जल-भूवैज्ञानिक व पर्यावरणीय अभ्यास’ हा शोधप्रबंध सादर केला होता. शेरी नाल्याबद्दलचा परिपूर्ण अभ्यास करून त्यांनी अनेक गंभीर निष्कर्ष काढले आहेत.

अहवालात काय म्हटले आहे?

  • शेरी नाल्यामुळे होत असलेल्या नदीच्या विषारीपणाचा जनतेच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी ७० प्रतिनिधींनी अनेक घरगुती नमुने गोळा केले होते.
  • त्यात असे आढळून आले आहे, की ९ टक्के कुटुंब कॉलराने, १३ टक्के कावीळने, ६४ टक्के विविध पोटविकाराने, तर १४ टक्के टायफाईड आजाराने ग्रस्त आहेत.
  • नदीच्या पाण्यात अनेक रासायनिक घटक मिसळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
  • जलचरांसह मानवी आरोग्यास शेरी नाल्याचे सांडपाणी नदीत मिसळणे अत्यंत धोकादायक आहे.

हे षडयंत्र नव्हे तर काय?महापालिका नदीत सांडपाणी सोडते म्हणून दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेकडून दीड कोटी रुपयांचा दंड गोळा करीत आहे. पैसे घेऊन मंडळ महापालिकेला प्रदूषणास परवानगी देते, तर महापालिका नागरिकांचे पैसे घेऊन नागरिकांनाच दूषित पाणी पाजते. शासन स्तरावर नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने शेरी नाला शुद्धीकरण प्रकल्प रेंगाळला आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी नदी प्रदूषण सुरू ठेवण्यासाठीच प्रयत्न चालविले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीHealthआरोग्यriverनदीpollutionप्रदूषण