शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जीडीपीच्या दरावर मोजला जाणारा विकास चिंतेची बाब, अनिरुद्ध पंडित यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:12 IST

जगातील २५ टक्के नैसर्गिक साधनसंपत्ती एकटा अमेरिका देश वापरतो

सांगली : जीडीपीच्या दरावर मोजला जाणारा विकास चिंतेची बाब ठरत आहे. पुढील पिढीचा विचार करून नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व्हायला हवा, अन्यथा एका टप्प्यानंतर ऱ्हासाला सुरुवात होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केले. सांगलीत मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात प्रा. डॉ. बी. एन. कुलकर्णी स्मृती व्याख्यानमालेत ‘देशाची प्रगती आणि निसर्ग’ या विषयावर ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते.विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी प्रस्ताविक केले. डॉ. पंडित म्हणाले, औद्योगिक धोरणात एकही थेंब सांडपाणी बाहेर सोडण्याची परवानगी नाही. किमान ३० टक्के सांडपाणी पुनर्प्रक्रिया करून वापरण्याची सक्ती आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम आपण कोरोना काळात अनुभवले. आपण काहीतरी गमावल्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. ‘आमची परवानगी न घेताच आमची साधने का वापरली?’ असा प्रश्न पुढील पिढी विचारेल. निसर्गाचे अनुकरण केले तरच श्वासत विकासाकडे जाऊ.ते म्हणाले, वाढती लोकसंख्या भविष्यात साधनसंपत्तीला मागे टाकणार आहे. ती शक्यता टाळण्यासाठी आजचे शास्त्रज्ञ काम करत आहेत. प्रगतीसाठी पाणी व ऊर्जेची गरज आहे. समुद्राचे पाणी वापरण्यायोग्य करण्यावर मर्यादा आहेत. या स्थितीत सूर्याची ऊर्जा एकमेव अक्षय ठरते.यावेळी अनिल कुलकर्णी, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जी. आर. सावंत, एस. एम. अंगडी, सी. एस. चितळी, प्राचार्य मद्वाण्णा आदी उपस्थिती होते. उर्मिला ताम्हणकर यांनी पसायदान गायले. महेश कराडकर यांनी आभार मानले. डॉ. बी. एन. कुलकर्णी चॅरिटेबल ट्रस्टने आयोजन केले.

अमेरिकेची भूक मोठीजगातील २५ टक्के नैसर्गिक साधनसंपत्ती एकटा अमेरिका देश वापरतो. त्या वेगाने सर्वांनी वापर सुरू केला तर एकावेळी पाच पृथ्वी लागतील. युरोपसाठी साडेतीन पृथ्वी लागतील. भारत मात्र ०.७ पृथ्वी वापरत आहे. वर्षभराची ऊर्जा भारत देश २५ डिसेंबरला संपवतो. आखाती देश फेब्रुवारी-मार्चमध्येच संपवतात. हे चित्र बदलण्यासाठी शास्त्रज्ञ काम करत आहेत. 

टॅग्स :Sangliसांगली