शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जीडीपीच्या दरावर मोजला जाणारा विकास चिंतेची बाब, अनिरुद्ध पंडित यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:12 IST

जगातील २५ टक्के नैसर्गिक साधनसंपत्ती एकटा अमेरिका देश वापरतो

सांगली : जीडीपीच्या दरावर मोजला जाणारा विकास चिंतेची बाब ठरत आहे. पुढील पिढीचा विचार करून नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व्हायला हवा, अन्यथा एका टप्प्यानंतर ऱ्हासाला सुरुवात होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केले. सांगलीत मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात प्रा. डॉ. बी. एन. कुलकर्णी स्मृती व्याख्यानमालेत ‘देशाची प्रगती आणि निसर्ग’ या विषयावर ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते.विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी प्रस्ताविक केले. डॉ. पंडित म्हणाले, औद्योगिक धोरणात एकही थेंब सांडपाणी बाहेर सोडण्याची परवानगी नाही. किमान ३० टक्के सांडपाणी पुनर्प्रक्रिया करून वापरण्याची सक्ती आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम आपण कोरोना काळात अनुभवले. आपण काहीतरी गमावल्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. ‘आमची परवानगी न घेताच आमची साधने का वापरली?’ असा प्रश्न पुढील पिढी विचारेल. निसर्गाचे अनुकरण केले तरच श्वासत विकासाकडे जाऊ.ते म्हणाले, वाढती लोकसंख्या भविष्यात साधनसंपत्तीला मागे टाकणार आहे. ती शक्यता टाळण्यासाठी आजचे शास्त्रज्ञ काम करत आहेत. प्रगतीसाठी पाणी व ऊर्जेची गरज आहे. समुद्राचे पाणी वापरण्यायोग्य करण्यावर मर्यादा आहेत. या स्थितीत सूर्याची ऊर्जा एकमेव अक्षय ठरते.यावेळी अनिल कुलकर्णी, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जी. आर. सावंत, एस. एम. अंगडी, सी. एस. चितळी, प्राचार्य मद्वाण्णा आदी उपस्थिती होते. उर्मिला ताम्हणकर यांनी पसायदान गायले. महेश कराडकर यांनी आभार मानले. डॉ. बी. एन. कुलकर्णी चॅरिटेबल ट्रस्टने आयोजन केले.

अमेरिकेची भूक मोठीजगातील २५ टक्के नैसर्गिक साधनसंपत्ती एकटा अमेरिका देश वापरतो. त्या वेगाने सर्वांनी वापर सुरू केला तर एकावेळी पाच पृथ्वी लागतील. युरोपसाठी साडेतीन पृथ्वी लागतील. भारत मात्र ०.७ पृथ्वी वापरत आहे. वर्षभराची ऊर्जा भारत देश २५ डिसेंबरला संपवतो. आखाती देश फेब्रुवारी-मार्चमध्येच संपवतात. हे चित्र बदलण्यासाठी शास्त्रज्ञ काम करत आहेत. 

टॅग्स :Sangliसांगली