विकासामुळे राष्ट्रवादीला वाढता जनाधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:15+5:302021-09-12T04:30:15+5:30
फोटो ओळ : चिखली (ता. शिराळा) येथे कांदेच्या सरंपच मनीषा कुंभार, नवनाथ कुंभार, राजेंद्र कांबळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ...

विकासामुळे राष्ट्रवादीला वाढता जनाधार
फोटो ओळ : चिखली (ता. शिराळा) येथे कांदेच्या सरंपच मनीषा कुंभार, नवनाथ कुंभार, राजेंद्र कांबळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांनी त्यांचा सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : दिवसेंदिवस शिराळा मतदार संघातील विकासाचा वाढता वेग, होणारी सर्वसामान्यांची कामे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे कांदे ग्रामपंचायत सरंपच मनीषा कुंभार, तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष नवनाथ कुंभार व सोसायटी संचालक राजेंद्र कांबळे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार प्रसंगी आमदार नाईक बोलत होते. शेतकरी सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, निवडणुकीपुरते राजकारण, इतर सर्व वेळ समाजकारणासाठी देत आहे. माझ्या समोर येणारे सार्वजनिक हिताचे काम पूर्ण करणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करत आहेत. त्यामुळे मोठी विकासकामे साधली जात आहेत. निधीबाबत पक्षाचे नेते मंडळी व महाआघाडीचे सरकार खंबीर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली येणाऱ्र्यांची संख्या दिवसागणिक वाढतच राहणार आहे.
यावेळी दत्तात्रय पाटील, महादेव पाटील, गजानन पाटील, दिलीप पाटील, निवास पाटील, संभाजी पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित होते.