शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वाढत्या धर्मांधतेमुळे देशाचा पाकिस्तान होईल - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:54 IST

आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

इस्लामपूर : आपला देश धर्मांधतेकडे वाटचाल करीत आहे. असे झाल्यास त्याचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. धर्मांधता कधीही विकासाचा मार्ग दाखवू शकत नाही. आपल्या आजू-बाजूचे देश धर्मांधतेकडे झुकले आणि उद्ध्वस्त झाले आहेत. आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.इस्लामपूर येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार अमोल मेटकरी, युवा नेते प्रतीक पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर उपस्थित होत्या.यावेळी जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी हा सर्व जाती-धर्माचा पक्ष आहे. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पिढीला पुढे आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार यशवंतराव चव्हाण आणि पवारसाहेबांनी राज्याला दिला. कोल्हापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत २३ रोजी संकल्प सभेने या परिवार संवाद यात्रेचा समारोप होईल.धनंजय मुंडे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपचे अर्धवटराव आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकारणाचा नव्हे, तर श्रद्धेचा विषय आहेत. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारे रयतेचे राजकारण करीत आहेत. त्यांनी अठरा पगड जातीतील कार्यकर्त्यांना संधी दिली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल.अमोल मेटकरी म्हणाले, खासदार शरद पवार यांच्या हृदयात छत्रपती आहेत. तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर यांची इतकी अॅलर्जी का? हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र आम्हाला तोंडपाठ आहेत. भाजपवाल्यांनी आम्हाला धर्म व भक्ती शिकवू नये. राज ठाकरे तुम्ही अयोध्येला जाताना झेड प्लस सुरक्षा कवच घेऊन कशाला जाता? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड