शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गटातटाचे राजकारण खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 15:51 IST

कार्यकर्त्यांनी कोणत्याही नेत्यांच्या मागे फिरू नये. त्याचा तिकीट मिळण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही. पक्षाने तिकीट देण्याचे धोरण बदलले

सांगली : जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे. गटातटाचे राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास तो खपवून घेणार नाही. कितीही मोठा नेता असला तरी गटबाजीबद्दल तातडीने कारवाई करण्यात येईाल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथील मेळाव्यात दिला.भाजपच्या शहर आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा येथील भावे नाट्यमंदिरात पार पडला. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर आदी उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, गटबाजीचे राजकारण मला चालणार नाही. या गोष्टी कानावर आल्या तर कारवाई केली जाईल. याशिवाय जे पदाधिकारी किंवा नेते काम करणार नाहीत, त्यांच्याविषयीसुद्धा योग्य विचार केला जाईल. २०२४ मध्ये राज्यात आणि देशात भाजपचे सरकार यायचे असेल तर पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दररोज किमान दोन तास पक्षासाठी दिले पाहिजेत. प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला पक्षाचा कार्यकर्ता हक्काचा वाटला पाहिजे. हा उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला असून, त्याचा आढावा जानेवारीमध्ये घेतला जाणार आहे.आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातून ८ आमदार आणि २ खासदार भाजपचेच असतील, असा विश्वास व्यक्त करून बावनकुळे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचे मिळून आगामी निवडणुकीत ४५हून अधिक खासदार आणि २०० आमदार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.गोपीचंद पडळकर म्हणाले, राष्ट्रवादीला संधिवाताप्रमाणे आलेली सत्तेची सूज आता उतरली असल्यामुळे गावागावांत पुन्हा शाखा सुरू करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राष्ट्रवादीवर वर्चस्व असणाऱ्या पवारांच्या घरातच फूट पडत चालली आहे.ग्रामपंचायतीत पक्षाला चांगले यश मिळेल. तसेच कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आता परिस्थिती बदलली असून, येत्या निवडणुकीत एक धक्का मारण्याची गरज आहे, असे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले.

नेत्यांच्या मागे फिरू नकाबावनकुळे म्हणाले की, भविष्यात कार्यकर्त्यांनी कोणत्याही नेत्यांच्या मागे फिरू नये. त्यांचा सत्कारही करू नये. त्याचा तिकीट मिळण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही. पक्षाने तिकीट देण्याचे धोरण बदलले आहे. त्यानुसार निवडणुकीत प्रत्येक उमेदवारीसाठी तीन जणांची नावे पाठवून त्यातील एक नाव सर्वेक्षणानुसार निश्चित होईल.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे