शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मैदान लोकसभेचे, वारे विधानसभेचे! पलूस-कडेगावचे चित्र : कदम-देशमुख यांच्या होमग्राऊंडवर चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:12 AM

सांगली लोकसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची भिस्त कदम-देशमुख कुटुंबातील वजनदार नेत्यांच्या पलूस-कडेगाव मतदार संघातील कामगिरीवर राहणार आहे. या मतदारसंघात

प्रताप महाडिक ।कडेगाव : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची भिस्त कदम-देशमुख कुटुंबातील वजनदार नेत्यांच्या पलूस-कडेगाव मतदार संघातील कामगिरीवर राहणार आहे. या मतदारसंघात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीचे वारेही वाहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अधिक जोर लावला जाणार आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपला तोडीसतोड उमेदवार म्हणून आ. डॉ. विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह होता; परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देत पलूस-कडेगावमधून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याचे समजते. भाजपकडून विद्यमान खा. संजय पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे.

दरम्यान, उमेदवारी कोणालाही मिळो, पलूस-कडेगाव मतदार संघात आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कदम-देशमुख कुटुंबातील नेत्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे. कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद आ. मोहनराव कदम यांच्याकडे, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आहे. आ. विश्वजित कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी तर आहेच, पण ते राज्यस्तरावर कॉँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, तर भाजपचे संग्रामसिंह देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. यामुळे या वजनदार नेत्यांच्या होमग्राऊंडवरील कामगिरीकडे त्यांच्या पक्षाच्या हायकमांडचे लक्ष राहणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना २७ हजार ५१९ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांनी २४ हजार ३४ इतके मताधिक्य घेऊन पलूस-कडेगावचा गड अबाधित ठेवला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी यांच्यासह आघाडीतील मित्र पक्षांची साथ काँग्रेसला मिळणार आहे. भाजपलाही शिवसेना आणि युतीतील मित्रपक्षांची साथ मिळणार आहे.

भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत यश मिळविले आणि पलूस व कडेगाव दोन्ही पंचयात समित्यांची सत्ता घेतली. दुसऱ्या बाजूला बहुतांशी ग्रामपंचायती तसेच पलूस नगरपालिका आणि कडेगाव नगरपंचायत ही सत्ता केंद्रे ताब्यात घेऊन काँग्रेसने ताकद दाखवली आहे.

तिसऱ्या शक्तीचे आघाडीला बळपलूस-कडेगाव मतदार संघात आजवर कदम विरुद्ध देशमुख-लाड असा संघर्ष झाला. परंतु आता वरिष्ठ स्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांच्या तिसऱ्या शक्तीचे बळही आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली