शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

सांगली जिल्ह्याच्या भूजलपातळीत यंदा एक मीटरने वाढ, पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:14 IST

जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे.

सांगली : यावर्षी जिल्ह्यात पावसाळा व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे तलाव, विहिरींच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढली आहे. यंदा ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील भूजलपातळीत ०.९७ मीटरने वाढ झाली असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली.जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे. त्यात यंदा पाऊसही समाधानकारक झाला आहे. नियमित माॅन्सूनपेक्षा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बहुतांश तलाव, ओढे भरले होते. यामुळेच भूजलपातळीत वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाच्या वतीने यंदा ८६ विहिरींचे निरीक्षण करून याबाबतच अहवाल तयार करण्यात आला आहे. यात ऑक्टोबरमध्ये २.६८ मीटर भूजलपातळी आढळून आली. सरासरी ०.९७ मीटर वाढ झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे, यापूर्वी दुष्काळी म्हणून नोंद असलेल्या जत आणि आटपाडी तालुक्यात यंदा समाधानकारक भूजलपातळी वाढली आहे. त्या तुलनेत पाणलोट क्षेत्र असलेल्या तालुक्यात भूजलपातळीत कमी वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहवालावरच विंधन विहिरींसह इतर विहिरींसाठी परवानगी मिळत असते. यंदा मात्र सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ झाल्याने कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.

तालुकासध्याची भूजलपातळीभूजलपातळीत झालेली वाढ (मीटरमध्ये)
मिरज२.४५०.१३
जत३.३९१.८५
खानापूर२.९४१.१३
वाळवा१.६१०.३३
तासगाव४.४२१.३१
शिराळा०.८९०.२१
आटपाडी३.२९१.०९
कवठेमहांकाळ२.६७१.८५
पलूस१.४५१.१५
कडेगाव३.६५०.६३
टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी