शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
3
मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
4
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
5
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
6
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
7
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
8
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे,'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
9
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
10
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
11
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
12
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
13
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
14
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
15
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
16
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
17
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
18
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
19
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
20
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवलापूर विमानतळासाठी केंद्राकडून हिरवा कंदील, १६५ एकर जागेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावा - मंत्री पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:02 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागेचा शोध घ्यावा, शेतीमाल वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगीची सोय

सांगली: कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ विकसित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी लागणारी १६५ एकर जमीन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आली. तसेच देशांतर्गत शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेला विशेष बोगी जोडण्यात येणार असून, मिरज जंक्शनवर शेतीमाल भरण्यासाठी रेल्वेकडून वेळ वाढवण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.सांगलीत शुक्रवारी जिल्ह्यातील उत्पादित फळपिके व शेतमालाच्या निर्यात व देशांतर्गत विक्रीला चालना देण्यासाठी कृषी विभाग आणि अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादक-खरेदीदार संमेलन आयोजित करण्यात आले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे उपमहाप्रबंधक प्रादेशिक प्रशांत वाघमारे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक कुंभार आणि शेतकरी व निर्यातदार सहभागी झाले.चंद्रकांत पाटील म्हणाले, कवलापूर येथे कार्गो विमानतळ विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला असून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १६५ एकर जागा उपलब्ध करून दिल्यास विमानतळ तयार करण्यास ते तयार आहेत, असे मंत्रालयाने पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे लवकर विमानतळ उभारून शेतीमालाच्या निर्यातीला चालना मिळेल. तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेला स्वतंत्र बोगी जोडली जाणार असून, मिरज जंक्शनवर शेतीमाल भरण्यासाठी वेळही वाढवण्यात येणार आहे. महिलांनीही उद्योगांमध्ये पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांना कर्ज देण्याची व्यवस्था करावी व शासन व्याजात सवलत देईल. शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावे आणि अपेडा निर्यातीसाठी लागणारी तांत्रिक मदत शेतकऱ्यांना देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.पणन संचालक विकास रसाळ म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पणन विभागाचे अधिकारी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करतील. प्रशिक्षण कार्यशाळांमुळे शेतकरी, आडते, व्यापारी आणि हमाल यांना सकारात्मक परिणाम होतील. शेतमालाला योग्य व वाजवी किंमत मिळणे हे पणन कायद्यातील मुख्य वैशिष्ट्य असून, काही मध्यस्थांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी विभाग कडकपणे काम करत आहे.विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या माध्यमातून शेतकरी संघटित होत आहेत आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Green Light for Kavlapur Airport; Acquire Land, Says Minister

Web Summary : Kavlapur airport project receives approval. Minister Patil urges land acquisition. Railway to add special wagons for farm produce transport from Miraj, boosting exports.