शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवलापूर विमानतळासाठी केंद्राकडून हिरवा कंदील, १६५ एकर जागेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावा - मंत्री पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:02 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागेचा शोध घ्यावा, शेतीमाल वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगीची सोय

सांगली: कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ विकसित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी लागणारी १६५ एकर जमीन मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आली. तसेच देशांतर्गत शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेला विशेष बोगी जोडण्यात येणार असून, मिरज जंक्शनवर शेतीमाल भरण्यासाठी रेल्वेकडून वेळ वाढवण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.सांगलीत शुक्रवारी जिल्ह्यातील उत्पादित फळपिके व शेतमालाच्या निर्यात व देशांतर्गत विक्रीला चालना देण्यासाठी कृषी विभाग आणि अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादक-खरेदीदार संमेलन आयोजित करण्यात आले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पणन संचालक विकास रसाळ, अपेडाचे उपमहाप्रबंधक प्रादेशिक प्रशांत वाघमारे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक कुंभार आणि शेतकरी व निर्यातदार सहभागी झाले.चंद्रकांत पाटील म्हणाले, कवलापूर येथे कार्गो विमानतळ विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला असून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १६५ एकर जागा उपलब्ध करून दिल्यास विमानतळ तयार करण्यास ते तयार आहेत, असे मंत्रालयाने पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे लवकर विमानतळ उभारून शेतीमालाच्या निर्यातीला चालना मिळेल. तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेला स्वतंत्र बोगी जोडली जाणार असून, मिरज जंक्शनवर शेतीमाल भरण्यासाठी वेळही वाढवण्यात येणार आहे. महिलांनीही उद्योगांमध्ये पुढाकार घ्यावा, यासाठी त्यांना कर्ज देण्याची व्यवस्था करावी व शासन व्याजात सवलत देईल. शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावे आणि अपेडा निर्यातीसाठी लागणारी तांत्रिक मदत शेतकऱ्यांना देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.पणन संचालक विकास रसाळ म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पणन विभागाचे अधिकारी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करतील. प्रशिक्षण कार्यशाळांमुळे शेतकरी, आडते, व्यापारी आणि हमाल यांना सकारात्मक परिणाम होतील. शेतमालाला योग्य व वाजवी किंमत मिळणे हे पणन कायद्यातील मुख्य वैशिष्ट्य असून, काही मध्यस्थांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी विभाग कडकपणे काम करत आहे.विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या माध्यमातून शेतकरी संघटित होत आहेत आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Green Light for Kavlapur Airport; Acquire Land, Says Minister

Web Summary : Kavlapur airport project receives approval. Minister Patil urges land acquisition. Railway to add special wagons for farm produce transport from Miraj, boosting exports.